अ‍ॅपशहर

‘आचारसंहितेची अंमलबजावणी करा’

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक निकाल जाहीर करेपर्यंत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा अंमल असेल. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी (दि. १८) घेण्यात आलेल्या बैठकीत दिले.

Maharashtra Times 19 Oct 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon district talukas muncipal corporation election
‘आचारसंहितेची अंमलबजावणी करा’


राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक निकाल जाहीर करेपर्यंत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा अंमल असेल. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी (दि. १८) घेण्यात आलेल्या बैठकीत दिले.


जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकरी आस्तिककुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मोक्षदा पाटील, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, संजय मस्कर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी आचारसंहिता अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली. त्यात सभांसाठी मैदाने उपलब्ध करून देताना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार द्यावेत. शासकीय वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पालन करावे. पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांना संवेदनशील भागांचे संयुक्त सर्वेक्षण करून उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, आचारसंहिता भंगाबाबत तत्काळ गुन्हे दाखल करणे आदींसाठी सर्व विभागांचा परस्पर समन्वय आवश्यक असल्याचे सांगून सर्व संबंधितांनी समन्वयाने कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी केली.


निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत, नगर परिषदांच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी (दि. १८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आस्तिककुमार पाण्डेय असतील. उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. रात्री १० नंतर सभा, ध्वनिप्रदूषण मर्यादा अधिनियमाची अंमलबजावणी, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदींबाबत कारवाई करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. शस्त्रजमा करणे, अवैध दारू संदर्भात कारवाई करणे या उपाययोजना संयुक्तपणे करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज