अ‍ॅपशहर

हॉकर्स, मनपा पथकात पाठशिवणीचा खेळ

मध्यवर्ती बाजारापेठेत गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. सकाळपासूनच विक्रेते व अतिक्रमण निर्मूलनच्या पथकाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सुभाष चौक व शिवाजी रोडच्या गल्लांमधील टपऱ्यांचे अतिक्रमण काढताना वाद होऊन तणाव निर्माण झाला होता.

Maharashtra Times 30 Sep 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon mahapalica action
हॉकर्स, मनपा पथकात पाठशिवणीचा खेळ


मध्यवर्ती बाजारापेठेत गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. सकाळपासूनच विक्रेते व अतिक्रमण निर्मूलनच्या पथकाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सुभाष चौक व शिवाजी रोडच्या गल्लांमधील टपऱ्यांचे अतिक्रमण काढताना वाद होऊन तणाव निर्माण झाला होता.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी पोलिस बंदोबस्तात सुभाष चौक, बळीराम पेठ व शिवाजी रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यात मोठ्या प्रमणात हातगाड्यांसह साहित्य जप्त करण्यात आले. तीनही रस्ते दुपारपर्यंत मोकळे करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी या ठिकाणी पुन्हा हॉकर्सनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांसह आलेल्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात करताच बाजारात धावपळ झाली. अवघ्या तासांतच सर्व हॉकर्स माल घेऊन पळून गेले. त्यांच्या मागे पथकातील कर्मचारी पळत होते. त्यामुळे या भागात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. बाजारपेठेतील विक्रेत्यांना पुन्हा हटविल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने चौबे मार्केटमागील गल्ली, सुभाष चौक व शिवाजी रोडच्या बोळींमध्ये असलेल्या अतिक्रमणला टार्गेट केले. या गल्ल्यांमधील टपऱ्या, लपवून ठेवण्यात आलेल्या हातगाड्या पोलिस बंदोबस्तात पथकाने जप्त केल्या. उभारलेल्या पक्क्या टपऱ्या काढण्यासाठी तीन तासांचा अवधी देण्यता आला होता. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वाहनांभोवती जमलेल्या काही संतप्त विक्रेत्यांनी पथकाला शिवीगाळ करीत ट्रॅक्टर पलटविण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, मनपा पथकातील कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना पिटाळून लावले. सुभाष चौक रस्त्याच्या एका बोळीत हातगाड्या तयार करण्याचा, तसेच हातगाड्या भाड्याने देण्याचा कारखाना होता. संबंधित मालकाला सर्व हातगाड्या काढून घेण्याच्या सूचना देण्यात आली. पानटपरी, सलून अशी पक्की अतिक्रमणेदेखील काढण्यात आली. काही ठिकाणी वाद झाल्याने तणाव देखील निर्माण झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज