राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
मनपाच्या निवडणुकीत संपूर्ण जागा लढविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी या आघाडीची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली. बलाढ्य उमेदवारांसाठी आमच्या पक्षाची दारे उघडी आहेत. शिवसेना-खाविआचे उमेदवारदेखील आमच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर आघाडीची बैठक मजदूर फेडरेशन येथे पार पडली. बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉंग्रेसचे डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, विनायकराव देशमुख, हेमलता पाटील, अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह समाजवादी पार्टीचे मुफ्ती हरुन नदवी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, आघाडीतर्फे संपूर्ण ७५ जागांवर उमेदवार दिले जाणार असून, १९ प्रभागांसाठी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली. आता उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्यांना आम्ही अर्ज भरण्यासाठी सांगितल्याचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
गद्दारांना जनता दाखविणार जागा
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने भाजप, खाविआच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, युतीच्या निर्णयानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवाराला संधी द्यायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्षांसह अनेक विद्यमान नगरसेवकांनी बंडखोरी करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर करणे ज्यांच्या त्यांचा निष्ठेचा प्रश्न असतो. परंतु, ज्यांना पक्षाने प्रतिष्ठा, पद देऊन मान-सन्मान दिला. मात्र, त्या गद्दारांनी पक्षासोबत गद्दारी केली. त्यांना निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवणार, अशी टीका आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
मनपाच्या निवडणुकीत संपूर्ण जागा लढविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व समाजवादी पार्टी या आघाडीची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली. बलाढ्य उमेदवारांसाठी आमच्या पक्षाची दारे उघडी आहेत. शिवसेना-खाविआचे उमेदवारदेखील आमच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर आघाडीची बैठक मजदूर फेडरेशन येथे पार पडली. बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉंग्रेसचे डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, विनायकराव देशमुख, हेमलता पाटील, अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह समाजवादी पार्टीचे मुफ्ती हरुन नदवी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, आघाडीतर्फे संपूर्ण ७५ जागांवर उमेदवार दिले जाणार असून, १९ प्रभागांसाठी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली. आता उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. त्यांना आम्ही अर्ज भरण्यासाठी सांगितल्याचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
गद्दारांना जनता दाखविणार जागा
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने भाजप, खाविआच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, युतीच्या निर्णयानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवाराला संधी द्यायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्षांसह अनेक विद्यमान नगरसेवकांनी बंडखोरी करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर करणे ज्यांच्या त्यांचा निष्ठेचा प्रश्न असतो. परंतु, ज्यांना पक्षाने प्रतिष्ठा, पद देऊन मान-सन्मान दिला. मात्र, त्या गद्दारांनी पक्षासोबत गद्दारी केली. त्यांना निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवणार, अशी टीका आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.