अ‍ॅपशहर

‘कामबंद’मुळे अस्वच्छता

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून लिलाव करण्यात यावा या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आज (दि. १९)पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात होत असल्याने स्वच्छतेसाठी नेमून दिलेल्या शेकडो वाहनांची चाकेही थांबणार आहे. बुधवारी (दि. १८) अक्षयतृतीयेची सुटी असली तरी बंदचा परिणाम कामावर झाल्याने अनेक भागात स्वच्छतेची कामे झाली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

Maharashtra Times 19 Apr 2018, 4:00 am
मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon municipal corporation workers andolan works shut down affects on jalgaon city cleaning
‘कामबंद’मुळे अस्वच्छता


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून लिलाव करण्यात यावा या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आज (दि. १९)पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात होत असल्याने स्वच्छतेसाठी नेमून दिलेल्या शेकडो वाहनांची चाकेही थांबणार आहे. बुधवारी (दि. १८) अक्षयतृतीयेची सुटी असली तरी बंदचा परिणाम कामावर झाल्याने अनेक भागात स्वच्छतेची कामे झाली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे. इतकेच नव्हे तर महागार्इ भत्यांच्या रकमांचीदेखील अदायगी करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या २० मार्केटमधील गाळ्यांच्या मुदती संपल्या आहेत. त्यातून महापालिकेला उत्पन्न येणे शक्य आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव करण्याच्या मागणीसाठी महापलिकेच्या सफार्इ मजदूर संघाने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

जळगावकरांना दुर्गंधीचा सामना
आज (दि. १९) आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील साफसफाईचे कामदेखील थांबणार आहेत. मनपा सफाई कर्मचाऱ्यांकडून शहरातील १७ प्रभागांमध्ये साफसफाई केली जाते तर इतर २० प्रभागांमध्ये मक्तेदाराकडून सफाईचे काम केले जाते. त्यामुळे शहरातील १७ प्रभागांमधील सफाईचे कामदेखील थांबणार असून, कोणत्याही भागातील कचरा उचलला जाणार नाही. त्याचा पूर्ण फटका शहराच्या स्वच्छतेवर होणार आहे. यामुळे जळगावकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनातील सर्व कामे बंद
या आंदोलनास आता मक्तेदारांकडूनदेखील पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काम बंद आंदोलनात आरोग्य विभागाचे ४८५ कर्मचारी, २२ सहाय्यक आरोग्य निरीक्षक व अधिक्षक सहभागी होणार आहेत. त्यामुळे ३५ घंटागाड्या, १० ट्रॅक्टर, ४ डंपर, जेसीबीचे काम बंद राहणार आहे. तसेच चारही प्रभाग समित्यांमधील कामेही बंद राहणार असल्याच माहिती संघाचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी दिली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शाळा व शाळांचे कामकाज बंद राहणार आहे. महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गाळे ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा मनपा संघटनेने दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज