सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या वाघूर पाणीपुरवठा योजना, विमानतळ व जिल्हा बँक गैरव्यवहर या पाच गुन्ह्यांची ‘एसआयटी’कडून फेरचौकशी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. या निकालास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या पाच गुन्ह्यांची ‘एसआयटी’कडून फेरचौकशी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्यांच्या फिर्यादीत नावे असलेल्या माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.
विमानतळ, वाघूर तसेच जिल्हा बँकेच्या आयबीपी (इनलॅण्ड बील पर्चेसिंग), स्टार्च फॅक्टरी, महावीर बँक या बहुचर्चित घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिस ठाणे व जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास स्वतंत्र एसआयटीमार्फत करण्यात यावा, असा अर्ज गुन्ह्यांमधील तक्रारदार अॅड. विजय पाटील यांच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात देण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने जिल्हा बँकेसह विमानतळ व वाघूर पाच गुन्ह्यांचा विशेष तपास फोर्स (एसआयटी) मार्फत फेरतपास करण्यात यावा, असे आदेश दिले. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे, व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दि. ३ मे रोजी हा निकाल दिला होता. आजपावेतो या पाचही गुन्ह्यांतील करण्यात आलेली सर्व कार्यवाहीला या निकालात स्थगिती देण्यात आली होती.
दोन मिनिटांत फेटाळल्या याचिका
या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली इसीपी हौसिंग (इंडिया) प्रा. लि. चे व्यवस्थापक गिरधरलाल आर. ओसवाल यांनी ६ मे २०१९ रोजी तसेच माजी नगरसेवक राधेशाम मदनलाल कोगटा यांनी दि. ७ मे रोजी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. भानुमती व सुभाष रेड्डी यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश कायम ठेवत अवघ्या दोन मिनिटांत न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या वाघूर पाणीपुरवठा योजना, विमानतळ व जिल्हा बँक गैरव्यवहर या पाच गुन्ह्यांची ‘एसआयटी’कडून फेरचौकशी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. या निकालास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या पाच गुन्ह्यांची ‘एसआयटी’कडून फेरचौकशी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्यांच्या फिर्यादीत नावे असलेल्या माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.
विमानतळ, वाघूर तसेच जिल्हा बँकेच्या आयबीपी (इनलॅण्ड बील पर्चेसिंग), स्टार्च फॅक्टरी, महावीर बँक या बहुचर्चित घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिस ठाणे व जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास स्वतंत्र एसआयटीमार्फत करण्यात यावा, असा अर्ज गुन्ह्यांमधील तक्रारदार अॅड. विजय पाटील यांच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात देण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने जिल्हा बँकेसह विमानतळ व वाघूर पाच गुन्ह्यांचा विशेष तपास फोर्स (एसआयटी) मार्फत फेरतपास करण्यात यावा, असे आदेश दिले. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे, व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दि. ३ मे रोजी हा निकाल दिला होता. आजपावेतो या पाचही गुन्ह्यांतील करण्यात आलेली सर्व कार्यवाहीला या निकालात स्थगिती देण्यात आली होती.
दोन मिनिटांत फेटाळल्या याचिका
या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली इसीपी हौसिंग (इंडिया) प्रा. लि. चे व्यवस्थापक गिरधरलाल आर. ओसवाल यांनी ६ मे २०१९ रोजी तसेच माजी नगरसेवक राधेशाम मदनलाल कोगटा यांनी दि. ७ मे रोजी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. भानुमती व सुभाष रेड्डी यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश कायम ठेवत अवघ्या दोन मिनिटांत न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.