अ‍ॅपशहर

एकनाथ खडसे पक्षात आले आणि...; राष्ट्रवादीनं सांगितलं बोदवडच्या पराभवाचं कारण

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जळगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत चिंतन केले. गाफील राहिल्याचा फटका बसला, असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला.

Edited byगणेश कदम | Lipi 9 Mar 2022, 2:54 pm
जळगाव: 'एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आले. नाथाभाऊ पक्षात आल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी निवांत होते. याचाच फटका बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बसला. गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला,' अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जळगावचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी आज व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Khadse
एकनाथ खडसे


वाचा: ...म्हणून या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही; पवारांनी सांगितलं कारण

अविनाश आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी बोदवडच्या पराभवाचं विश्लेषण केलं. 'नाथाभाऊ आणि आम्ही एकत्र आलो. त्यामुळं आम्ही गाफील राहिलो ‍आणि त्यामुळंच आमचा घात झाला, असं स्वत: रवींद्र पाटील यांनी सांगितलंय. त्यातच सगळं आलं, असं आदिक म्हणाले. ' नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून बोध घेऊन आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य ती काळजी घेतली जाईल. आजच्या आढावा बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत. त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये दिसेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचा: 'मोठ्या आवाजात गाणी लावून रात्री गाड्या फिरवायच्या हे छत्रपतींचे विचार आहेत का?'

महाविकास आघाडीचा उपयोग काय?; कार्यकर्त्यांनी मांडले गार्‍हाणे

'राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र स्थानिक पातळीवर महाआघाडी सरकारमधील मित्रपक्ष आम्हाला विचारात घेत नाहीत, असं गाऱ्हाणं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अविनाश आदिक यांच्यासमोर मांडलं. 'राज्यपातळीवर महाविकास आघाडीचं काम उत्तम सुरू आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यातून कुरबुरी होतात. पण कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवला पाहिजे. तरीही कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखून पुढील निर्णय घेण्यात येतील. आगामी काळातील निवडणुका या वरिष्ठांच्या आदेशानुसार लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या त्या ठिकाणची पक्षाची ताकद लक्षात घेऊन स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज