अ‍ॅपशहर

पिंडदान करीत महामार्ग प्राधिकरणचे उत्तरकार्य

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मोठमोठे खड्डे पडून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे. खड्डेमय महामार्गावर अपघात होवून नागरिकांचे बळी जात आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करुन देखील महामार्ग प्राधिकरणाकडून (नही) खड्डे दुरुस्त करण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नशिराबादवासियांनी मुंडन करून 'नही'चे प्रतिकात्मक दशक्रिया विधी करीत उत्तर कार्यही केले. पिंडदानही यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2020, 4:18 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगावगेल्या काही महीन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मोठमोठे खड्डे पडून राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे. खड्डेमय महामार्गावर अपघात होवून नागरिकांचे बळी जात आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करुन देखील महामार्ग प्राधिकरणाकडून (नही) खड्डे दुरुस्त करण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नशिराबादवासियांनी मुंडन करून 'नही'चे प्रतिकात्मक दशक्रिया विधी करीत उत्तर कार्यही केले. पिंडदानही यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे, दुखवटा बांधून नागरिकांसह लोकप्रतिनीधींनी क्रियेचे जेवणही घेतले.जळगाव जिल्ह्यातून व शहरातून गेलेला महामार्ग दिवसेंदीवस धोकादायक होत आहे. खड्ड्यांमुळे महामार्ग अक्षरक्ष: मृत्यचा सापळा झाला आहे. महामार्गावरील गावांजवळ अपघात होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या काही महीन्यांपासून तर या महामार्गावर जिल्ह्यात दररोज अपघात होवून एक बळी जात आहे. यामुळे साऱ्या जिल्ह्यात असंतोष पसरला आहे. महार्गावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यासाठी नशिराबादवासियांना अनेकवेळा महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले होते. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जळगाव शहरात येवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रतिकात्मक उत्तरकार्य घालत आपला रोष व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon people unhappy due to bad conditions of national highway roads
पिंडदान करीत महामार्ग प्राधिकरणचे उत्तरकार्य

अपघातामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, रखडलेले चौपदरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे. दि. २८ जानेवारीला ' नही ' ला प्रतिकात्मक बोळवण देऊन निषेध नोंदविला. किमान आता तरी ' नही ' विभाग रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल घेईल अशी अपेक्षा होती. मात्र दहा दिवसांच्या कालावधीत खड्यांची समस्या जैसे थे च असल्याने मरणासन्न असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. आंदोलकांनी यावेळी मुंडन करून 'नही'चा प्रतिकात्मक दशक्रिया विधी केला. आंदोलक एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी उत्तर कार्य करत पिंडदानही केले. त्यानंतर सर्वांनी दशक्रियेचे जेवण घेतले.या केल्यात मागण्याआंदोलनानंतर नशिराबाद येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या 'नही' प्रशासनाला वठणीवर आणावे, महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.या आंदोलनात सरपंच विकास पाटील उपसरपंच कितीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन ,शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बऱ्हाटे, सय्यद बरकत आली, नवाब सर आदींसह मोठ्या संख्येने नशिराबादचे ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.
1 min

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज