अ‍ॅपशहर

जळगावच्या तरुणाची इचलकरंजीत हत्या

शालकाच्या लग्नपत्रिका वाटपासाठी गेलेल्या तरुणाची इचलकरंजीमध्ये हत्या झाली. ही घटना शुक्रवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येबाबत कळताच जळगावातील कंजरवाड्यात नातेवाईकांनी टाहो फोडला.

Maharashtra Times 7 May 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon youth killing at ichalkaranjit
जळगावच्या तरुणाची इचलकरंजीत हत्या


शालकाच्या लग्नपत्रिका वाटपासाठी गेलेल्या तरुणाची इचलकरंजीमध्ये हत्या झाली. ही घटना शुक्रवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येबाबत कळताच जळगावातील कंजरवाड्यात नातेवाईकांनी टाहो फोडला.

जळगावातील तांबापुरामधील कंजरवाड्यामध्ये बबलू सुभाष नवले (वय २५) हे पत्नी नूतन, मुलगी जान्हवी (वय १२), वैष्णवी (वय १०), दर्शन (वय ७) यांच्यासह राहतात. बबलूचे शालक विशाल विनायक नेतले (रा. संजय गांधी नगर जोशी कॉलनी, कंजरवाडा) यांचा विवाह सोहळा दि. ८ मे होणार होता. त्यानिमित्त बबलू हे लक्ष्मीबाई मलके यांच्यासोबत कोल्हापूर, इचलकरंजी, पूणे, बारामती परिसरात लग्नपत्रिका वाटपासाठी गेले होते. त्यावेळी रोहन सावंत नेतले आणि बबलू दुचाकीने पत्रिका वाटपासाठी निघाले होते. शुक्रवारी, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रोहन नेतले यांचा कृणालशी पूर्ववैमनस्यातून वाद झाला. या दोघांचा वाद सोडविण्यासाठी बबलू गेला असता त्याच्याशीही कृणालने बाचाबाची केली. यानंतर बकनौर चौकात कृणाल व त्याचा मामा यांच्यासह चार ते पाच तरुण आले. त्यांनी लोखंडी रॉडने बबलूला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रोहन नेतले याने घटनास्थळाहून पळ काढला. या झटापटीमध्ये एक युवक जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून नागरिकांसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याला सीटी हॉस्पिटलला दाखल केले. याठिकाणी शनिवारी (दि. ६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बबलूचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी नूतनसह नातेवाईकांनी आक्रोश केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कृणाल सावंत, त्याचा मामा व सोबत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज