अ‍ॅपशहर

विकासकामांना विधानसभेनंतरच मुहूर्त

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, पावसाळ्याचे आगमन व आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहितेची शक्यता यामुळे महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतील कामांसाठी अंतिम मंजुरी नसल्याने ती कामेही लांबणीवर पडणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 15 May 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon satra majli


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, पावसाळ्याचे आगमन व आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहितेची शक्यता यामुळे महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतील कामांसाठी अंतिम मंजुरी नसल्याने ती कामेही लांबणीवर पडणार आहेत.

आता लोकसभेची आचारसंहिता सुरू असून, त्यानंतर पावसाळा लागल्याने बांधकामाची कामे होणार नाहीत. यानंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर त्याची आचारसंहिता असेल अशा परिस्थितीत शहरातील अनेक विकासकामे लांबणीवर पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीतील ५० कोटींच्या मोठ्या कामांनाही बांधकाम विभाग व जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा आहेच. तर उर्वरित ५० कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे, त्या कामांना शासनाची मान्यता घेवून निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्याचे काम सुरू झाले आहे. याउलट मनपाकडून सुमारे १६२ कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मात्र, नेमकी तेव्हाच तांत्रिक मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लोकसभेची आचारसंहिता लागू झाली.

आचारसंहितेचे सावट

सध्या महापालिकेकडून या कामांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत. यातील छोट्या कामांच्या ५० कोटी रुपयांच्या कामांना महापालिकेने दिलेल्या हमीपत्रावर दोन्ही विभागांनी मान्यता दिली आहे तर उर्वरित अधीक्षक अभियंता व वरिष्ठ अधिकारी यांच्या अखत्यारीतील कामांच्या मान्यतेसाठी महापालिकेला कामांच्या एकूण रकमेवर ०.२५ टक्के तांत्रिक मान्यतेचे शुल्क भरावे लागणार आहे. महापालिका प्रशासनाने तसे बिलही तयार केले असून, प्रस्तावांना मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, आता ही मंजुरी मिळाली तरी २३ मेनंतरच या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रियेत एक महिना जाईल. पुढे पावसाळा असल्याने ही विकासकामे सुरू करता येणार नाहीत. पावसाळा संपण्यापूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असल्याने प्रत्यक्षात ही कामे सुरू होण्यासाठी जळगावकरांना निवडणूक होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज