म .टा. प्रतिनिधी, जळगाव
बाहेरून आलेल्या प्रवाशांशी सन्मानाने वागून रिक्षाचालकांनी शिस्त पाळली पाहिजे. शहराची ओळख रिक्षाचालकांवरून होत असते, असे सांगत पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गणवेशासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम रिक्षाचालकांना दिला आहे. त्यानंतर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पोलिस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शनिवारी (दि. ४) रिक्षाचालकांचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे, महारू पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक यांनी आपले मत मांडले. तर कायदेविषयक माहिती जयंत पाटील यांनी रिक्षाचालकांना दिली. शहरातील विविध रिक्षा चालकांच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह रिक्षाचालकांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. यावर मंचावरील उपस्थितांनी मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मानले.
सोमवारपासून कारवाई
थोड्या पैशांसाठी फ्रंटसिट बसवून प्रवाशांसह स्वतःचा जीव धोक्यात टाकला जातो. त्यामुळे या रिक्षाचालकांवर सोमवार (दि. ६) पासून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी सांगितले. गणवेश, आवश्यक कागदपत्रे, रिक्षांचा परवाना यांच्यासह वाहतुकीचे नियमांचे पालन करीत असलेली रिक्षा आढळल्यास त्यावर पोलिस दलातर्फे स्टिकर्स लावण्यात येतील. या रिक्षाला पुढे त्रास दिला जाणार नसल्याचे संकेत मेळाव्यात पोलिस अधीक्षकांनी दिले. सोमवारपासून ही मोहीम शहर वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणार आहे.
गणवेश, कागदपत्रे बाळगणे, फ्रंटसिट प्रवाशी न बसविणे, रिक्षांमधील आरसे काढून टाकणे, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी न भरणे, रिक्षा थांबावरूनच प्रवाशांची ने-आण करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी केले आहे.
‘मीटर बसवा’
केंद्राने वाढवलेले कर कमी करता येणार नसल्याचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. ६० टक्के रिक्षा विनापरवाना असल्याचे सांगत रिक्षाचालकांनी मीटर लावले तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
बाहेरून आलेल्या प्रवाशांशी सन्मानाने वागून रिक्षाचालकांनी शिस्त पाळली पाहिजे. शहराची ओळख रिक्षाचालकांवरून होत असते, असे सांगत पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गणवेशासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम रिक्षाचालकांना दिला आहे. त्यानंतर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पोलिस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शनिवारी (दि. ४) रिक्षाचालकांचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे, महारू पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक यांनी आपले मत मांडले. तर कायदेविषयक माहिती जयंत पाटील यांनी रिक्षाचालकांना दिली. शहरातील विविध रिक्षा चालकांच्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह रिक्षाचालकांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. यावर मंचावरील उपस्थितांनी मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मानले.
सोमवारपासून कारवाई
थोड्या पैशांसाठी फ्रंटसिट बसवून प्रवाशांसह स्वतःचा जीव धोक्यात टाकला जातो. त्यामुळे या रिक्षाचालकांवर सोमवार (दि. ६) पासून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी सांगितले. गणवेश, आवश्यक कागदपत्रे, रिक्षांचा परवाना यांच्यासह वाहतुकीचे नियमांचे पालन करीत असलेली रिक्षा आढळल्यास त्यावर पोलिस दलातर्फे स्टिकर्स लावण्यात येतील. या रिक्षाला पुढे त्रास दिला जाणार नसल्याचे संकेत मेळाव्यात पोलिस अधीक्षकांनी दिले. सोमवारपासून ही मोहीम शहर वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणार आहे.
गणवेश, कागदपत्रे बाळगणे, फ्रंटसिट प्रवाशी न बसविणे, रिक्षांमधील आरसे काढून टाकणे, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी न भरणे, रिक्षा थांबावरूनच प्रवाशांची ने-आण करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी केले आहे.
‘मीटर बसवा’
केंद्राने वाढवलेले कर कमी करता येणार नसल्याचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. ६० टक्के रिक्षा विनापरवाना असल्याचे सांगत रिक्षाचालकांनी मीटर लावले तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.