अ‍ॅपशहर

महिन्याभरापासूनच महापौर बदलाचे वारे

गेल्या महिनाभरापासून महापालिकेत महापौर बदलाचे वारे वाहत होते. मनसेचे ललित काल्हे यांना शेवटच्या वर्षात महापौरपद देऊ असे खान्देश विकास आघाडीचे प्रणेते सुरेश जैन यांनी दिले होते.

Maharashtra Times 24 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgoan mayor reisgn issue
महिन्याभरापासूनच महापौर बदलाचे वारे


गेल्या महिनाभरापासून महापालिकेत महापौर बदलाचे वारे वाहत होते. मनसेचे ललित काल्हे यांना शेवटच्या वर्षात महापौरपद देऊ असे खान्देश विकास आघाडीचे प्रणेते सुरेश जैन यांनी दिले होते. त्यानुसार खांदेपालटाची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत महापालिकेच चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी रात्री आठ वाजता महापौर नितिन लढ्ढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे राजिनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत खान्देश विकास आघाडीचे शरद तायडे, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र मुंदडा होते.महापौर लढ्ढांकडून नम्रपणा शिकलो

राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी महापौर यांच्यासोबत गेल्या पावणेदोन महिन्यांच्या प्रभारी आयुक्तपदाच्या काळात केलेल्या कामाबद्दल गौरवोद्‍गार काढले. इतके नम्र महापौर पहिल्यांदाच पाहिले. त्यांच्याकडून नम्रपणा शिकल्याचेही ते म्हणाले. या काळात महापौरांनी प्रशासनाच्या कामात अडथळा न आणता कायम विकासासाठी मदत केल्याचे ते म्हणाले. गाळ्यांवर लगेच कारवाई करू नका शासनाचा निर्णय झाल्यावर चर्चेतून दिशा ठरवू, असे महापौरांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

बांध फुटला!

जिल्हाधिकारी यांचे बोलून झाल्यावर मावळते महापौर नितीन लढ्ढा यांचा बांध फुटला. आणि महापौरांना अश्रू अनावर झाले. त्यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे आभार मानून अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून दूर जात असल्यानेच आपण भावूक झाल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी भावूक झालेल्या लढ्ढा यांना स्वत: गाडीपर्यंत सोबत केली. त्यानंतर नितीन लढ्ढा यांनी जळगाव शहरासाठी खूप केले असून, आणखीही खूप करायचे आहे. आता चांगले प्रशासकीय अधिकारी आल्याने कामांना सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.

आदेशानुसार राजीनामा

आपल्याला राजीनामा द्यावा लागल्याबद्दल कुठलीही नाराजी नसल्याचे यावेळी नितीन लढ्ढा यांनी सांगितले. नेते सुरेश जैन यांनीच पदावर बसविले होते. त्यांनी आदेश दिल्यानेच राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. राजीनामा का घेतला? यावर नेत्यांना कारण विचारायची पद्धत नसते, याची आठवण त्यांनी करून दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज