महासभेत २५ कोटींची कामे मनपाकडून करण्यास मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
आरोग्य विभागासाठी ९० रुपये प्रतिलिटरची जंतुनाशके १३२० रुपयांप्रमाणे घेऊन लाखो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तसेच कामात सक्षम नसल्याने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव बुधवारी (दि. ९) झालेल्या विशेष महासभेत करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीतील कामे महापालिकेमार्फत करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्यानंतर त्याच लगेचच दुसऱ्या विशेष महासभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी टीडीआर घोटाळ्याप्रकरणी चुकीचे मत देणारे अॅड. केतन ढाके यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शासनाने याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी दिली असल्याचे सांगितले. यात पदाधिकारी यांनाही मत मांडण्याची संधी देणार असल्याचेही ते म्हणाले.
आरोग्य अधिकारी धारेवर
सभेत नितीन बरडे, स्थायी सभापती वर्षा खडके यांनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या कार्यशैली व जंतूनाशक घोटाळ्यावरून संताप व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी २३ लाखाची जंतुनाशके खरेदी करण्याचे कार्यादेश आधीच देऊन त्यानंतर स्थायी सभेची मंजुरी घेतली. जंतुनाशके व दुर्गंधीनाशकांची किंमत ९० रुपये लिटर असताना ती १३२० रुपये लिटरच्या भावाने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच खरेदी करून ६ महिने ते साहित्य वापरले नसल्याचे सांगितले. तसेच डॉ. पाटील यांच्या कामाबद्दल सर्वांचीच नाराजी असल्याचे सांगितले. सर्वपक्षीय सदस्यांनी डॉ. पाटील यांच्याविरुद्ध भावना व्यक्त केल्याने त्यांना कार्यमुक्त करून त्यांचे काम सक्षम अधिकारी यांच्याकडे सोपविण्याचा ठराव करण्यात आला.
शाहू रुग्णालय पीपल्स बँक चालविणार
पहीलाच विषय रस्ते व चौकातील दुभाजक सुशोभीकरणासाठी खासगी संस्थेला देण्याचा विषय नामंजूर करण्यात आला. त्यानंतर भुसंपादनाच्या विषयास मंजूरी देण्यात आली. त्यानंतर छत्रपती शाहू रुग्णालय जळगाव पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट यांना देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी भाजप गटनेते सुनील माळी यांनी ३० वर्षांसाठी जागा देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. जागेची भाडे घेणार का? अशी विचारणा त्यांनी केली. यावर महापौर लढ्ढा यांनी जागा भाड्याने देत नाही तर चालविण्यास देत असल्याचे सांगितले. १४ कोटी भाडे घेण्यापेक्षा संस्था यासाठी २८ लाख रुपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाही सेवाभावी संस्थेस द्या
सभेत रवींद्र पाटील यांनी महापालिकेची परिस्थिती बिकट असल्याने सर्व कामे लोकसहभागातून केली जात आहेत. महापालिका चालविण्यास कार्यक्षम नसल्याने महापालिकाही सेवाभावी संस्थेस चालविण्यास द्यावी असेही पाटील यांनी सांगितले.
तलावाला डांबरीकरण
तलावाभोवतीच्या रस्त्याला डांबरीकरणास पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना तसेच ही जागा पालिकेची नसताना डांबरीकरणाचा अट्टहास का? असा प्रश्न सुनील माळी यांनी केला. शहरात इतर ठिकाणी रस्ते गटारी कराव्या, असे त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी ही कामे करता येत नसल्याचे सांगितले. महापौरांनी इतरत्र रस्ते गटारीचे कामे अमृत योजनेमुळे करता येणार नाहीत. निधी परत जावू नये म्हणून निर्णय घेतल्याचे सांगितले. आरोग्य विभागासाठी १४ व्या वित्त आयोगातून ३ कोटी २२ लाख ८७ हजार ४९० रुपयांचे साहित्य घेण्याचा प्रस्ताव आहे. यात ४ वाटर टँकर, व्हॅक्युम १ नग, रॉडिंग मशिन १ नग, साफसफाईचे साहित्य, १ ते ३७ वॉर्डातील १५० नग कचरा कंटेनर, २ नग फिरते शौचालय व ६ टॅक्टर ट्रॉलीसह, १ रोबोटीक जेसीबी मशिन यांचा समावेश आहे. महापालिकेच्या भोईटे शाळेची इमारत अनुभूती शाळेला शैक्षणिक कामांसाठी देण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. यावर रवींद्र पाटील यांनी सत्ता व पैशांसमोर चांगले विचार टिकत नाही, असे सांगितले.
२५ कोटींवरून चकमक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले २५ कोटी रुपयांच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप करीत हा प्रकार अयोग्य असल्याचे महापौर यांनी सांगितले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे सुपरव्हिजन शुल्क अनावश्यक द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा निधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे मिळाल्याचे कैलास सोनवणे म्हणाले. यावरून सत्ताधारी व भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी या निधीतील कामे मनपाकडून करण्याचा ठराव करण्यात आला. अशाप्रकारे बांधकाम विभागाकडे काम दिल्यास यापुढे आमदार व खासदार निधीतील कामे महापालिका मंजूर करणार नाही, असा इशारा रमेश जैन यांनी शेवटी दिला.
रस्त्यांच्या नावाने गैरव्यवहार
२५ कोटींचा निधी बांधकाम विभागात देवून पैसे खाण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपचे सुनील माळी यांच्या वॉर्डातील चांगला रस्ता या निधीतून पुन्हा ५४ लाख रुपये खर्च करून करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ही गोष्ट महापौर व बांधकाम अभियंता यांना माहित असल्याचेही त्यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
आरोग्य विभागासाठी ९० रुपये प्रतिलिटरची जंतुनाशके १३२० रुपयांप्रमाणे घेऊन लाखो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी तसेच कामात सक्षम नसल्याने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव बुधवारी (दि. ९) झालेल्या विशेष महासभेत करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीतील कामे महापालिकेमार्फत करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्यानंतर त्याच लगेचच दुसऱ्या विशेष महासभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी टीडीआर घोटाळ्याप्रकरणी चुकीचे मत देणारे अॅड. केतन ढाके यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शासनाने याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी दिली असल्याचे सांगितले. यात पदाधिकारी यांनाही मत मांडण्याची संधी देणार असल्याचेही ते म्हणाले.
आरोग्य अधिकारी धारेवर
सभेत नितीन बरडे, स्थायी सभापती वर्षा खडके यांनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या कार्यशैली व जंतूनाशक घोटाळ्यावरून संताप व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी २३ लाखाची जंतुनाशके खरेदी करण्याचे कार्यादेश आधीच देऊन त्यानंतर स्थायी सभेची मंजुरी घेतली. जंतुनाशके व दुर्गंधीनाशकांची किंमत ९० रुपये लिटर असताना ती १३२० रुपये लिटरच्या भावाने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच खरेदी करून ६ महिने ते साहित्य वापरले नसल्याचे सांगितले. तसेच डॉ. पाटील यांच्या कामाबद्दल सर्वांचीच नाराजी असल्याचे सांगितले. सर्वपक्षीय सदस्यांनी डॉ. पाटील यांच्याविरुद्ध भावना व्यक्त केल्याने त्यांना कार्यमुक्त करून त्यांचे काम सक्षम अधिकारी यांच्याकडे सोपविण्याचा ठराव करण्यात आला.
शाहू रुग्णालय पीपल्स बँक चालविणार
पहीलाच विषय रस्ते व चौकातील दुभाजक सुशोभीकरणासाठी खासगी संस्थेला देण्याचा विषय नामंजूर करण्यात आला. त्यानंतर भुसंपादनाच्या विषयास मंजूरी देण्यात आली. त्यानंतर छत्रपती शाहू रुग्णालय जळगाव पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट यांना देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी भाजप गटनेते सुनील माळी यांनी ३० वर्षांसाठी जागा देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. जागेची भाडे घेणार का? अशी विचारणा त्यांनी केली. यावर महापौर लढ्ढा यांनी जागा भाड्याने देत नाही तर चालविण्यास देत असल्याचे सांगितले. १४ कोटी भाडे घेण्यापेक्षा संस्था यासाठी २८ लाख रुपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाही सेवाभावी संस्थेस द्या
सभेत रवींद्र पाटील यांनी महापालिकेची परिस्थिती बिकट असल्याने सर्व कामे लोकसहभागातून केली जात आहेत. महापालिका चालविण्यास कार्यक्षम नसल्याने महापालिकाही सेवाभावी संस्थेस चालविण्यास द्यावी असेही पाटील यांनी सांगितले.
तलावाला डांबरीकरण
तलावाभोवतीच्या रस्त्याला डांबरीकरणास पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना तसेच ही जागा पालिकेची नसताना डांबरीकरणाचा अट्टहास का? असा प्रश्न सुनील माळी यांनी केला. शहरात इतर ठिकाणी रस्ते गटारी कराव्या, असे त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी ही कामे करता येत नसल्याचे सांगितले. महापौरांनी इतरत्र रस्ते गटारीचे कामे अमृत योजनेमुळे करता येणार नाहीत. निधी परत जावू नये म्हणून निर्णय घेतल्याचे सांगितले. आरोग्य विभागासाठी १४ व्या वित्त आयोगातून ३ कोटी २२ लाख ८७ हजार ४९० रुपयांचे साहित्य घेण्याचा प्रस्ताव आहे. यात ४ वाटर टँकर, व्हॅक्युम १ नग, रॉडिंग मशिन १ नग, साफसफाईचे साहित्य, १ ते ३७ वॉर्डातील १५० नग कचरा कंटेनर, २ नग फिरते शौचालय व ६ टॅक्टर ट्रॉलीसह, १ रोबोटीक जेसीबी मशिन यांचा समावेश आहे. महापालिकेच्या भोईटे शाळेची इमारत अनुभूती शाळेला शैक्षणिक कामांसाठी देण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. यावर रवींद्र पाटील यांनी सत्ता व पैशांसमोर चांगले विचार टिकत नाही, असे सांगितले.
२५ कोटींवरून चकमक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले २५ कोटी रुपयांच्या निधीतील कामे बांधकाम विभागाकडून करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप करीत हा प्रकार अयोग्य असल्याचे महापौर यांनी सांगितले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे सुपरव्हिजन शुल्क अनावश्यक द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा निधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे मिळाल्याचे कैलास सोनवणे म्हणाले. यावरून सत्ताधारी व भाजपच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी या निधीतील कामे मनपाकडून करण्याचा ठराव करण्यात आला. अशाप्रकारे बांधकाम विभागाकडे काम दिल्यास यापुढे आमदार व खासदार निधीतील कामे महापालिका मंजूर करणार नाही, असा इशारा रमेश जैन यांनी शेवटी दिला.
रस्त्यांच्या नावाने गैरव्यवहार
२५ कोटींचा निधी बांधकाम विभागात देवून पैसे खाण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपचे सुनील माळी यांच्या वॉर्डातील चांगला रस्ता या निधीतून पुन्हा ५४ लाख रुपये खर्च करून करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. ही गोष्ट महापौर व बांधकाम अभियंता यांना माहित असल्याचेही त्यांनी सांगितले.