जळगाव, धुळ्यात पावसाचा शिडकावा, फत्तेपूर परिसरात गारपीट; रब्बी पिकांचे नुकसान
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यात रविवारी (दि. ११) दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच जळगाव शहरात काही मिनिटांसाठी पावसाचा शिडकावा झाला. तर जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरासह मांडले, मांडवा, तोंडापूर, किन्ही, वाकडी, वाकोद, नांद्रा हवेली, भारूडखेडा, ढालसिंगी, तळेगाव, कापूसवाडी शिवारात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम वाया गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसत होते. रविवारी (दि. ११) अचानक झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू आणि हरभरा मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात झालेल्या या नुकसानीची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले नियोजित दौरे बाजूला सारून पाहणी केली. या वेळी मंत्री महाजन यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.
फत्तेपूर परिसरात नुकसान
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात रविवारी, दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरासह मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. फत्तेपूर परिसरात झालेल्या या नुकसानीत खाडवा, तोंडापूरला पिकांचे नुकसान झाले आहे.
रब्बीच्या पिकांना फटका
जळगावसह धुळे जिल्ह्यातही रविवारी (दि. ११) सकाळी पावसाचा शिडकाव झाला. यामुळे हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार रविवारी, सकाळी जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकावा झाला. यामध्ये धुळे शहरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास तसेच जळगाव शहरातही सकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील खानापूर येथेही विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी (दि. १०) सायंकाळीदेखील भडगाव तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला आहे. मात्र या अचानक गारपीट व अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यात रविवारी (दि. ११) दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच जळगाव शहरात काही मिनिटांसाठी पावसाचा शिडकावा झाला. तर जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरासह मांडले, मांडवा, तोंडापूर, किन्ही, वाकडी, वाकोद, नांद्रा हवेली, भारूडखेडा, ढालसिंगी, तळेगाव, कापूसवाडी शिवारात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम वाया गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसत होते. रविवारी (दि. ११) अचानक झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू आणि हरभरा मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात झालेल्या या नुकसानीची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले नियोजित दौरे बाजूला सारून पाहणी केली. या वेळी मंत्री महाजन यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.
फत्तेपूर परिसरात नुकसान
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात रविवारी, दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. या गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरासह मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. फत्तेपूर परिसरात झालेल्या या नुकसानीत खाडवा, तोंडापूरला पिकांचे नुकसान झाले आहे.
रब्बीच्या पिकांना फटका
जळगावसह धुळे जिल्ह्यातही रविवारी (दि. ११) सकाळी पावसाचा शिडकाव झाला. यामुळे हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार रविवारी, सकाळी जळगाव व धुळे जिल्ह्यात पावसाचा शिडकावा झाला. यामध्ये धुळे शहरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास तसेच जळगाव शहरातही सकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील खानापूर येथेही विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी (दि. १०) सायंकाळीदेखील भडगाव तालुक्यात पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला आहे. मात्र या अचानक गारपीट व अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली.