अ‍ॅपशहर

लालमाती ग्रामस्थांचा बहिष्कार

विकासकामे होत नसल्याने कंटाळलेल्या रावेर तालुक्यातील लालमाती या गावातील ३४० मतदारांनी गुरुवारी (दि. १६) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील ३४५ पैकी फक्त पाच लोकांनी मतदान केले. ते पाचही लोक हे नोकरदार असून त्यापैकी चार शिक्षक आणि एक कोतवाल आहे. या बहिष्काराबाबत जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सायंकाळपर्यंत माहिती नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या गावात मतदान केंद्र पूर्णपणे ओस पडले होते.

Maharashtra Times 17 Feb 2017, 4:00 am
३४५ पैकी केवळ पाच जणांचे मतदान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laalmati villagers boycott zp election voting in raver taluka
लालमाती ग्रामस्थांचा बहिष्कार


म. टा. वृत्तसेवा, रावेर

विकासकामे होत नसल्याने कंटाळलेल्या रावेर तालुक्यातील लालमाती या गावातील ३४० मतदारांनी गुरुवारी (दि. १६) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील ३४५ पैकी फक्त पाच लोकांनी मतदान केले. ते पाचही लोक हे नोकरदार असून त्यापैकी चार शिक्षक आणि एक कोतवाल आहे. या बहिष्काराबाबत जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सायंकाळपर्यंत माहिती नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या गावात मतदान केंद्र पूर्णपणे ओस पडले होते.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लालमाती गावाची एकूण मतदार संख्या ही ३४५ आहे. गावातील समस्या, शेतीप्रश्न, रस्ते, घरकुल आदींच्या असुविधांमुळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गावाच्या आजूबाजूला दोन धरणे आहेत. तरी धरणांचा लालमाती शिवारातील शेती शिवारास काहीही फायदा होत नाही, त्यांना बियाणे मिळत नाही. कुठलाही लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकारीही कमकुवत ठरत आहे. तहसीलदार विजयकुमार ढगे यांना सायंकाळी याबाबत विचारणा केली असता त्यांनी मतदान झाल्याचे सांगितले. बहिष्काराचे कारणही त्यांना माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. सकाळपासूनच रावेर तहसील कार्यालयाच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार तळ ठोकून असताना त्यांना बहिष्काराबाबत माहिती नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. ग्रामस्थांनी बुधवारी, सायंकाळी बैठकीत सर्वानुमते हा बहिष्कार टाकण्याचे ठरवले होते.

तरीही विकास नाही

सध्यस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे असून आमदार हरिभाऊ जावळे हे दोघेही भाजपचे आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये लालमाती हे पाल-केऱ्हाळा गटात येत होते. या गटातून भाजपचेच सुरेश धनके हे विजयी होऊन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून कारभार सांभाळत असतानाही या गटातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. या निवडणुकीपासून लालमाती या गावाचा समावेश वाघोदा-विवरा गटात झाला आहे. गावापासून राज्यासह केंद्रात सरकार असतांनाही विकासकामांचा ठावठिकाणा नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे.

आमच्या गावाकडे कोणतीही योजना नसून पाच वर्षांत काहीच लक्ष दिलेले नाही. गावात सर्वच मजूर असूनही घरकुल नाही. कुठल्याही अधिकाऱ्याने गावकऱ्यांशी चर्चा केली नाही.

गणेश पवार, उपचसरपंच, लालमाती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज