म. टा. प्रतिनिधी, जळगाव : पारोळा तालुक्यातील एका गावातील तरुणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून नातेवाईकांच्या जमावाने या दाम्पत्यास लोखंडी सळईने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. आज पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
उषाबाई रोहिदास सोनवणे (वय २८, रा. राजीव गांधाी नगर, पारोळा) यांनी नुकताच रोहिदास सोनवणे यांच्याशी प्रेमविवाह केला. उषाबाईच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या घरी येवून उषाबाईसह तिचे पती रोहिदास सोनवणे यांना लोखंडी सळईने मारहाण केली. सोमवारी ही घटना घडली. या घटनेत त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर गंभीर दुखातप झाली. वीट मारुन उषाबाई यांच्या डाव्या हातचे मनगट फ्रॅक्चर केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. तसेच रोहिदास सोनवणे यांना जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली आहे.
मारहाण आणि धमकी प्रकरणी उषाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप उत्तम सरदार, महेंद्र उत्तम सरदार, विनोद उत्तम सरदार, मुकेश दिलीप सरदार, संगीताबाई दिलीप सरदार, अर्जनाबाई बाला सरदार, सायत्रीबाई छोटु महाले, सागर छोटु महाले (सर्व रा. मेहेटेहु, ता. पारोळा) यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नीच्या वादात १ महिन्याच्या चिमुकलीचा बळी, शेतातील विहिरीत फेकून हत्या
उषाबाई रोहिदास सोनवणे (वय २८, रा. राजीव गांधाी नगर, पारोळा) यांनी नुकताच रोहिदास सोनवणे यांच्याशी प्रेमविवाह केला. उषाबाईच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या घरी येवून उषाबाईसह तिचे पती रोहिदास सोनवणे यांना लोखंडी सळईने मारहाण केली. सोमवारी ही घटना घडली. या घटनेत त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर गंभीर दुखातप झाली. वीट मारुन उषाबाई यांच्या डाव्या हातचे मनगट फ्रॅक्चर केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले. तसेच रोहिदास सोनवणे यांना जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली आहे.
मारहाण आणि धमकी प्रकरणी उषाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप उत्तम सरदार, महेंद्र उत्तम सरदार, विनोद उत्तम सरदार, मुकेश दिलीप सरदार, संगीताबाई दिलीप सरदार, अर्जनाबाई बाला सरदार, सायत्रीबाई छोटु महाले, सागर छोटु महाले (सर्व रा. मेहेटेहु, ता. पारोळा) यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती-पत्नीच्या वादात १ महिन्याच्या चिमुकलीचा बळी, शेतातील विहिरीत फेकून हत्या