रावेर:
पाच वर्षांत शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यांत आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर असणारा महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कुऱ्हा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
डॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून, रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असताना काँग्रेसला सोडल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार त्यांनी मानले. ते म्हणाले की, जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लोकांना प्यायाला पाणी नाही.
सत्तेचा फायदा भाजपने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता मिळवण्याचे कारस्थान केंद्र शासन करीत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करून दोन वर्षे झाली पण कर्जमाफी मिळाली नाही. पाच वर्षांत दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना हाताला काम नाही. त्यामुळे जनतेच्या मनात भाजपबद्दल राग असून, त्याचे दर्शन मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखविल्याचे ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. सभेस अॅड. रवींद्र पाटील, अॅड. संदीप पाटील, माजी आमदार अरूण पाटील, संजय गरूड, डॉ. राधेश्याम चौधरी, उदय पाटील, विनोद तराळ, रशीद जमादार, जगदीश पाटील, राजीव पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
पाच वर्षांत शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यांत आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर असणारा महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कुऱ्हा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
डॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून, रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असताना काँग्रेसला सोडल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार त्यांनी मानले. ते म्हणाले की, जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लोकांना प्यायाला पाणी नाही.
सत्तेचा फायदा भाजपने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता मिळवण्याचे कारस्थान केंद्र शासन करीत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करून दोन वर्षे झाली पण कर्जमाफी मिळाली नाही. पाच वर्षांत दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना हाताला काम नाही. त्यामुळे जनतेच्या मनात भाजपबद्दल राग असून, त्याचे दर्शन मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखविल्याचे ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. सभेस अॅड. रवींद्र पाटील, अॅड. संदीप पाटील, माजी आमदार अरूण पाटील, संजय गरूड, डॉ. राधेश्याम चौधरी, उदय पाटील, विनोद तराळ, रशीद जमादार, जगदीश पाटील, राजीव पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.