अ‍ॅपशहर

‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांचा मोर्चा

मैत्रेय उद्योग परिवाराचे पीडित ग्राहक आणि प्रतिनिधींनी अठरा महिन्यांपासून कंपनीकडून कुठलाही परतावा मिळत नाही म्हणून मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Maharashtra Times 19 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maitreya companies investors agitation at jalgoan
‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांचा मोर्चा


मैत्रेय उद्योग परिवाराचे पीडित ग्राहक आणि प्रतिनिधींनी अठरा महिन्यांपासून कंपनीकडून कुठलाही परतावा मिळत नाही म्हणून मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याबाबत अद्याप प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच कोणती कारवाई करणार आहात याच्या माहितीची मागणी मार्चेकरांनी केली. फेब्रुवारी २०१५ पासून कंपनी बंद आहे. कंपनीचा सर्व डाटा सरकारवाडा पोलिस ठाणे नाशिक यांच्याकडे जमा आहे. त्यातील माहितीनुसार ग्राहकांचा परतावा लवकरात लवकर करण्यात यावा. मैत्रेयच्या बर्‍याच मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. परंतु, त्या प्रॉपर्टी विकण्यासंदर्भात काहीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. त्याबद्दल निर्णय घेण्यात यावा. मैत्रेय सर्व्हिसेस, मैत्रेय प्लॉटर्स ऍन्ड स्ट्रक्चर्स, मैत्री रिअल्टर अ‍ॅन्ड कंस्ट्रक्शन , मैत्री सुवर्णसिद्धी सर्व प्रा. लिमिटेड या चारही कंपन्यांची मालमत्ता प्रशासनाने घोषीत करावी. कंपनीचे संचालकांना समोर येण्यास भाग पाडावे. तसेच प्रशासन व कंपनी यांनी मालमत्ता जाहीररित्या विक्री करून ग्राहकांचा परतावा त्वरित द्यावा यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप शिसोदे, सचिव नीलेश वाणी सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज