अ‍ॅपशहर

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत; रस्त्यात मोठा अनर्थ घडला

man died in accident: जळगाव-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकीने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंपनीतून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली घडली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2022, 7:10 am
जळगाव-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकीने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंपनीतून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली घडली. हरेश्वर गोपाळ चौधरी (वय-५५) रा. भादली ता.जि.जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon man died accident
दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू


जळगाव तालुक्यातील भादली येथील रहिवासी हरेश्वर चौधरी हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्याला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका बॉयलर कंपनीत कामाला आहे. शुकवारी रात्री ८ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीएल २८९९) ने निघाले. जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या कंटेनरला (एचआर ३८ ए ७२२२) जोरदार धडक दिली. या अपघातात हरेश्वर चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पहिल्या रात्री समजलं पतीचं सत्य; दिरानं घेतला फायदा, पत्नीनं धक्कादायक प्रकार सांगितला
अपघाताची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार सुरेश अहिरे, विकास सातदिवे, साईनाथ मुंडे यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयत हरेश्वर यांच्या पश्चात पत्नी मालतीबाई, मुलगा वैभव आणि विवाहित मुलगी सुवर्णा असा परिवार आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज