म. टा. प्रतिनिधी, जळगाव
होलिकोत्सव साजरा झाल्यानंतर जळगाव शहरात तापमानाचा पारा वर चढायला सुरुवात झाली आहे. मार्च हिटच्या झळांमुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले आहे. सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत असणारे रणरणते ऊन नागरिकांना कासाविस करीत आहे. काल सोमवारनंतर मंगळवारी (दि. २८) जळगावचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
तापमानाच्या उच्चांकामुळे जळगाव हॉट सिटी म्हणून प्रसिद्धच आहे. यंदा जळगावात होळीनंतर तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सुरुवातीला ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असणारे तापमानाने सध्या ४२ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. या रणरणत्या उन्हाच्या पहिल्याच तडाख्याने जळगावकरांना बेहाल केले आहे.
फळे व शितपेयांना मागणी
गेल्या काही महिन्यांपासून दुपारी चहाच्या टपरीकडे जाणारी पावले आता ऊसाचा रस, ज्यूस अशा शीतपेयाच्या दुकानांकडे वळू लागली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूज, डांगर, मोसंबी, संत्री, द्राक्षे अशा मनासह शरीराला गारवा देणार्या फळांची आवक झाली आहे. या फळांना मागणी होत आहे. यासह ऊसाचा रस, जलजिरा तसेच फळांच्या ज्यूसचे दुकानावर नागरिकांची गर्दी होत आहे.
चाळीसगावही तापले
चाळीसगाव : मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच चाळीसगाव शहरात मे हिट जाणवू लागली असून, तापमानाने चाळिशी पार केली आहे. अचानक तापमान हे चाळिशी पार गेल्याने नागरिक बेजार झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यात दुपारी तापमानात आणखीच भर पडत असल्याने पारा ४० अंशांच्या पुढे सरकला आहे. बचाव म्हणून महिला, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी टोपी, मोठे रूमाल व स्कार्पचा वापर सुरू केला आहे.
धुळे, नंदुरबार ४० अंश
धुळे : शहरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला असून शहराचे तापमान ४० अंशांवर गेले आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात सकाळी दहा-अकरा वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होते. शहरात थंडपेय, लिंबूपाणी, ऊसाचा रस, ताक, ज्युसचे तात्पुरता स्वरुपात दुकान थाटण्यात आली आहेत. तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता कृषी महाविद्यालयातील तापमान मोजमाप कक्षाकडून देण्यात आली. नंदुरबारलाही दहा दिवसांपूर्वी ३९ अंशावर असलेल्या तापमानाने मंगळवारी ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.
होलिकोत्सव साजरा झाल्यानंतर जळगाव शहरात तापमानाचा पारा वर चढायला सुरुवात झाली आहे. मार्च हिटच्या झळांमुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले आहे. सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत असणारे रणरणते ऊन नागरिकांना कासाविस करीत आहे. काल सोमवारनंतर मंगळवारी (दि. २८) जळगावचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
तापमानाच्या उच्चांकामुळे जळगाव हॉट सिटी म्हणून प्रसिद्धच आहे. यंदा जळगावात होळीनंतर तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सुरुवातीला ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असणारे तापमानाने सध्या ४२ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. या रणरणत्या उन्हाच्या पहिल्याच तडाख्याने जळगावकरांना बेहाल केले आहे.
फळे व शितपेयांना मागणी
गेल्या काही महिन्यांपासून दुपारी चहाच्या टपरीकडे जाणारी पावले आता ऊसाचा रस, ज्यूस अशा शीतपेयाच्या दुकानांकडे वळू लागली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूज, डांगर, मोसंबी, संत्री, द्राक्षे अशा मनासह शरीराला गारवा देणार्या फळांची आवक झाली आहे. या फळांना मागणी होत आहे. यासह ऊसाचा रस, जलजिरा तसेच फळांच्या ज्यूसचे दुकानावर नागरिकांची गर्दी होत आहे.
चाळीसगावही तापले
चाळीसगाव : मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच चाळीसगाव शहरात मे हिट जाणवू लागली असून, तापमानाने चाळिशी पार केली आहे. अचानक तापमान हे चाळिशी पार गेल्याने नागरिक बेजार झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यात दुपारी तापमानात आणखीच भर पडत असल्याने पारा ४० अंशांच्या पुढे सरकला आहे. बचाव म्हणून महिला, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी टोपी, मोठे रूमाल व स्कार्पचा वापर सुरू केला आहे.
धुळे, नंदुरबार ४० अंश
धुळे : शहरात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढला असून शहराचे तापमान ४० अंशांवर गेले आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात सकाळी दहा-अकरा वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होते. शहरात थंडपेय, लिंबूपाणी, ऊसाचा रस, ताक, ज्युसचे तात्पुरता स्वरुपात दुकान थाटण्यात आली आहेत. तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता कृषी महाविद्यालयातील तापमान मोजमाप कक्षाकडून देण्यात आली. नंदुरबारलाही दहा दिवसांपूर्वी ३९ अंशावर असलेल्या तापमानाने मंगळवारी ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.