अ‍ॅपशहर

बाजार समितीला साडेबारा लाखांचा दंड

व्यापारी संकुल बांधण्यासाठी भिंत तोडून रस्ता करताना जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्याच आवारातील १२५ वृक्ष तोडले होते. या प्रकरणी बुधवारी झालेल्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीला १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दंडाची नोटीस आता मनपा प्रशासनाकडून पाठवली जाणार आहे.

Maharashtra Times 29 Aug 2019, 5:00 am
१२५ वृक्ष तोडल्याप्रकरणी वृक्ष प्राधिकरण समितीचा ठराव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम market committee fined twelve lakhs fifty thousand rupees in jalgoan
बाजार समितीला साडेबारा लाखांचा दंड


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

व्यापारी संकुल बांधण्यासाठी भिंत तोडून रस्ता करताना जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्याच आवारातील १२५ वृक्ष तोडले होते. या प्रकरणी बुधवारी झालेल्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीला १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दंडाची नोटीस आता मनपा प्रशासनाकडून पाठवली जाणार आहे.

जळगाव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत उपायुक्त उत्कर्ष गुट्टे, सदस्य नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रवीण कोल्हे, किशोर बाविस्कर, रंजना सोनार यांच्यासह अधिकारी सुनील भोळे, सुशील साळुंखे, एस. एस. पाटील, उदय पाटील, विलास सोनवणी उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेवर फांद्या व वृक्षतोडीचे १९ प्रस्ताव होते. तर आयत्यावेळीचे ४ प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले आहेत.

समितीला झटका
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आवारात व्यापारी संकुल बांधण्यासाठी संरक्षक भिंत तोडून रस्ता तयार केला होता. हा रस्ता तयार करीत असताना भिंतीलगत लावण्यात आलेली १२५ झाडे रस्त्यात दबली गेली होती. या प्रकरणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी तक्रार केली होती. त्यानुसार स्थळ पंचनामा करून या तक्रारीवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच परवानगी न घेता वृक्ष तोडणाऱ्या कृषी उत्पन्न समितीला प्रति झाड १० हजार रुपये असा १२ लाख ५० हजार रुपये दंड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महामार्गाची दुतर्फा झाडे स्थलांतरित करा
कृषी उत्पन्न समितीकडून बांधकामासाठी आवारातील आणखी ३७ झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर जी झाडे अडथळा ठरत असतील तीच तोडावी जितकी झाडे तोडणार त्यानुसार प्रत्येक वृक्षाला पाच झाडे याप्रमाणे वृक्षरोपण करण्याचा ठराव करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जळगावातून जाणारा महामार्ग चौपदरीकरणासह विस्ताराचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असणारी झाडे तोडण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेला परवानगी मागितली आहे. या प्रस्तावावर चर्चा करून महामार्गावरील जी झाडे स्थलांतरीत करण्यासारखी आहेत ती स्थलांतरित करावी, अशी सूचना करून प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज