जामनेर नगरपालिकेत वर्चस्व पुन्हा सिद्ध
gopal.paliwal@timesgroup.com
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात कोण बाजी मारतो, याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. गुरुवारी (दि. १२) दुपारी याचे उत्तर मतमोजणीनंतर समोर आले. त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी आपला गड राखत विरोधकांचे पानीपत केले. या स्पष्ट विजयानंतर महाजनांनी आपले मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध केले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात १७ जागा होत्या. मात्र, यावेळेस भाजपने जोरदार मुसंडी मारत मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्तवात पूर्ण जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात मिळवले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना मंत्री महाजनांनी एकप्रकारे धोबीपछाडच दिली आहे. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी आपल्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून जामनेरच्या या निवडणुकीमुळे वातावरण पूर्णपणे राजकीय होऊन गेले होते. या रणधुमाळीच्या सर्व आघाड्यांवर मंत्री महाजन यांनी वरचढ ठरत जनतेच्या विश्वासाची पावती या विजयाच्या रुपात मिळवली आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
पहिल्यांदाच सर्व जागांवर भाजप
जामनेर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. या निमित्ताने भाजपचा उमेदवार तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजय गरुड व पारस ललवाणी यांना हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. १२) सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडी घेतली होती. त्यांच्यासोबत इतर २४ नगरसेवक पदाचे उमेदवारदेखील आघाडीवर होते. दुपारी साधारण साडेअकरा वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल घोषीत करण्यात आले. या स्पष्ट बहुमतानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघावरील पकड अधोरेखित केलेली आहे.
जळगावचे पालकमंत्रीपद मिळणार?
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी, घोषीत करण्यात आलेल्या जामनेर नगरपालिकाच्या निकालात पूर्ण २४ जागा काबीज केल्याने मंत्री महाजनांना आता पालकमंत्रीपद दिले जाण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. जळगावकरांच्या गेल्या साडेतीन वर्षात बऱ्याच समस्या कायम असून, आगामी जळगाव महापालिका निवडणूक पाहता भाजपच्या ‘मिशन फिफ्टी प्लस’च्या मिशनला बळ देण्यासाठी वरिष्ठांकडून हा निर्णय घेतला जाण्याचेही बोलले जात आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद सांभाळतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवली होती. त्यामुळे जळगावला जर महापालिकेत सत्ता आणायची असेल तर या निवडणुकीतील नेतृत्व मंत्री गिरीश महाजनांच्या हाती देण्यात येऊ शकते.
gopal.paliwal@timesgroup.com
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात कोण बाजी मारतो, याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. गुरुवारी (दि. १२) दुपारी याचे उत्तर मतमोजणीनंतर समोर आले. त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी आपला गड राखत विरोधकांचे पानीपत केले. या स्पष्ट विजयानंतर महाजनांनी आपले मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवाद सिद्ध केले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात १७ जागा होत्या. मात्र, यावेळेस भाजपने जोरदार मुसंडी मारत मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्तवात पूर्ण जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात मिळवले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना मंत्री महाजनांनी एकप्रकारे धोबीपछाडच दिली आहे. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी आपल्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून जामनेरच्या या निवडणुकीमुळे वातावरण पूर्णपणे राजकीय होऊन गेले होते. या रणधुमाळीच्या सर्व आघाड्यांवर मंत्री महाजन यांनी वरचढ ठरत जनतेच्या विश्वासाची पावती या विजयाच्या रुपात मिळवली आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
पहिल्यांदाच सर्व जागांवर भाजप
जामनेर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. या निमित्ताने भाजपचा उमेदवार तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजय गरुड व पारस ललवाणी यांना हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. १२) सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडी घेतली होती. त्यांच्यासोबत इतर २४ नगरसेवक पदाचे उमेदवारदेखील आघाडीवर होते. दुपारी साधारण साडेअकरा वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल घोषीत करण्यात आले. या स्पष्ट बहुमतानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघावरील पकड अधोरेखित केलेली आहे.
जळगावचे पालकमंत्रीपद मिळणार?
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी, घोषीत करण्यात आलेल्या जामनेर नगरपालिकाच्या निकालात पूर्ण २४ जागा काबीज केल्याने मंत्री महाजनांना आता पालकमंत्रीपद दिले जाण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. जळगावकरांच्या गेल्या साडेतीन वर्षात बऱ्याच समस्या कायम असून, आगामी जळगाव महापालिका निवडणूक पाहता भाजपच्या ‘मिशन फिफ्टी प्लस’च्या मिशनला बळ देण्यासाठी वरिष्ठांकडून हा निर्णय घेतला जाण्याचेही बोलले जात आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद सांभाळतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवली होती. त्यामुळे जळगावला जर महापालिकेत सत्ता आणायची असेल तर या निवडणुकीतील नेतृत्व मंत्री गिरीश महाजनांच्या हाती देण्यात येऊ शकते.