अ‍ॅपशहर

षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही

मला मंत्रिमंडळातून बाहेर करण्यासाठी षडयंत्र रचणारे मोठे लोक आहेत. अजंली दमानिया त्यातील केवळ प्यादे आहेत. हे षडयंत्र रचणारे कितीही मोठे असोत त्यांना सोडणार नाही, असा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्या सर्वांना कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाची परतफेड करणार असल्याचेही ते म्हणाले.

Maharashtra Times 14 Jun 2018, 3:42 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mla eknath khadse press conference in bhusawal
षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही


मला मंत्रिमंडळातून बाहेर करण्यासाठी षडयंत्र रचणारे मोठे लोक आहेत. अजंली दमानिया त्यातील केवळ प्यादे आहेत. हे षडयंत्र रचणारे कितीही मोठे असोत त्यांना सोडणार नाही, असा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्या सर्वांना कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाची परतफेड करणार असल्याचेही ते म्हणाले.

खडसे मंत्रिमंडळाच्या बाहेर गेल्यामुळे ज्यांना फायदा होईल, त्यांच्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत माझी बदनामी सुरू ठेवण्याचा हा कट होता. या मागे कोण कोण आहे हे हळूहळू समोर येत आहे, असेही आमदार खडसे म्हणाले. भुसावळला बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार खडसे बोलत होते.

मंत्रिमंडळात परत येण्यापेक्षा मला दोन वर्षे जो त्रास झाला त्याचा हिशोब चुकता करणे महत्त्वाचे आहे. या काळात अ‍ॅन्टीकरप्शन, इन्कम टॅक्ससह अनेक यंत्रणांनी माझी कसून चौकशी केली मात्र त्यांना काहीच चुकीचे आढळले नाही. आता कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांची परतफेड करायची आहे. मी कुणालाही सोडणार नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे.

एका मंत्र्याचा समावेश
आ. खडसे यांना फसविण्यासाठी अंजली दमानिया यांनी आमिष दिल्याचे कल्पना इनामदार यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. तसेच या प्रकरणात एक मंत्रीदेखील असल्याचे कल्पना इनामदार यांनी म्हटल्याचे खडसे यांनी सांगितले. आपणास दोन वर्षे या कथित व बनावट आरोपांमुळे त्रास झाला असून, या लोकांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. यासाठीचा आपला संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी सांगीतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज