अ‍ॅपशहर

रार्इनापाडा घटनेच्या निषेधार्थ आज धरणे

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रार्इनपाडा या गावामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच तरुणांची मुले चोरीचा संशय व्यक्त करून हत्या करण्यात आली.

Maharashtra Times 13 Jul 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम morcha at jalgaon to apposed rainpada incident in sakri taluka
रार्इनापाडा घटनेच्या निषेधार्थ आज धरणे


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रार्इनपाडा या गावामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच तरुणांची मुले चोरीचा संशय व्यक्त करून हत्या करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ व भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटीचे संरक्षण देण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि. १२) सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या घटनेमुळे भटक्या विमुक्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून भटक्या विमूक्तांना अॅट्रासिटी अॅक्टनुसार संरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी राष्ट्रीय घुमंतू जनजाती मोर्चाचे माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सरकार, प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सकाळी १० ते दुपारी ५ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करीत असून, उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र खरे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज