अ‍ॅपशहर

कापसाचे यंदा विक्रमी उत्पादन

यंदा राज्यात कापसाचे एक कोटी गाठींचे विक्रमी उत्पादन होणार असून, ते देशात सर्वाधिक असण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक अरविंद जैन यांनी मंगळवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला. यामुळे गेले दोन तीन वर्षांपासून मरगळलेल्या जिनिंग उद्योगाला यामुळे संजीवनी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील महिन्यात जळगावला ‘ऑल इंडिया कॉटन ट्रेड मीट’ होत असून या निमित्ताने बैठकीसाठी अरविंद जैन जळगावला आले होते. या प्रसंगी खान्देश जीन प्रेस कारखानदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन, प्रशांत संघवी, अविनाश काबरा आदी संचालक उपस्थित होते.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अरविंद जैन यांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम more production of cotton in state
कापसाचे यंदा विक्रमी उत्पादन


विजय पाठक, जळगाव

यंदा राज्यात कापसाचे एक कोटी गाठींचे विक्रमी उत्पादन होणार असून, ते देशात सर्वाधिक असण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक अरविंद जैन यांनी मंगळवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला. यामुळे गेले दोन तीन वर्षांपासून मरगळलेल्या जिनिंग उद्योगाला यामुळे संजीवनी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील महिन्यात जळगावला ‘ऑल इंडिया कॉटन ट्रेड मीट’ होत असून या निमित्ताने बैठकीसाठी अरविंद जैन जळगावला आले होते. या प्रसंगी खान्देश जीन प्रेस कारखानदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन, प्रशांत संघवी, अविनाश काबरा आदी संचालक उपस्थित होते.

यंदा राज्यात समाधानकारक वेळेवर पाऊस व अनुकूल हवामान अशी स्थिती असून अशीच स्थिती कायम राहिल्यास राज्यात एक कोटी गाठी कापसाचे उत्पादन होण्याची अपेक्षा असून हे उत्पादन देशात सर्व राज्यांपेक्षा ते अधिक असेल, असे अरविंद जैन यांनी सांगितले. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसाचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना फटका बसला असून, गेल्यावर्षी राज्यात केवळ ८० लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले, असेही जैन म्हणाले.

यातील १५ लाख गाठींचा कापूस हा गुजरातमध्ये गेला होता. यात खान्देशचा विचार केला तर २० लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यात पाच लाख गाठींचा कापूस हा परप्रांतात गेला. यंदा वेळेवर होत असलेल्या पावसाने खान्देशात किमान २५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. यातून यंदादेखील किमान पाच लाख गाठींचा कापूस हा अडवला न गेल्यास परप्रांतात जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

१५ ऑक्टोबर नंतर तसेच पाऊस उघडल्यानंतर १५ दिवसांनी कापूस बाजारात येऊ लागेल, अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली. कापूस घरात आणून त्याचा स्टॉक न करता तो लगेच बाजारात विकला गेला तर शेतकरी फायद्यात राहतील. कारण मिलमध्ये कापसाचा स्टॉक शिल्लक नसल्याचे खान्देश जीनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले. जळगावचा कापूस हा देशात सर्वोत्तम कापूस ठरत आहे ही समाधानाची बाब आहे. याचा लाभ परप्रांतातील व्यापारी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. खान्देशात १५० वर जिनिंग फॅक्टरी असून या कापसाच्या जादा उत्पादनामुळे गेले दोन तीन वर्ष फटका बसलेल्या या कारखान्यांना यंदा बरी स्थिती राहील अशी अपेक्षा प्रदीप जैन यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज