म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत नागरिकांच्या मालमत्ता कराच्या रक्कमेवर दोन टक्के स्वच्छतेचा कर आकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. या करवाढीची अंमलबजावणी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात करण्यात येणार असल्याने यावर्षीच्या नवीन मालमत्ता कराच्या बिलांमध्ये जळगावकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी सेवा शुल्क म्हणून मालमत्ताधारकांना दोन टक्के तर, व्यावसायिक वापरकर्त्यांना चार टक्के शुल्क आकारावा असा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला असून, यापूर्वीच आपण विशेष साफसफाई करीत आहोत. तर त्याबदल्यात नागरिकांना सेवा मनपा देत नाही, असे शिवसेनेचे माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सांगितले होते. तसेच साफसफाई करात पुन्हा वाढ करू नये, असे मतदेखील त्यांनी मांडले होते. मात्र, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर साफसफाई करात वाढ केली होती. त्यानुसार रहिवाशी मालमत्तासाठी दोन तर, व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर चार टक्के करआकारणी नवीन बिलामध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जळगावकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. महापालिका साफसफाई कर वसूल करीत आहे. परंतु त्याबदल्यात पाहिजे त्या पद्धतीने साफसफाई होताना दिसून येत नाही. शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागलेले आहेत. नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत असतांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यात पुन्हा करवाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत नागरिकांच्या मालमत्ता कराच्या रक्कमेवर दोन टक्के स्वच्छतेचा कर आकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. या करवाढीची अंमलबजावणी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात करण्यात येणार असल्याने यावर्षीच्या नवीन मालमत्ता कराच्या बिलांमध्ये जळगावकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत घनकचरा व्यवस्थापनासाठी सेवा शुल्क म्हणून मालमत्ताधारकांना दोन टक्के तर, व्यावसायिक वापरकर्त्यांना चार टक्के शुल्क आकारावा असा ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला असून, यापूर्वीच आपण विशेष साफसफाई करीत आहोत. तर त्याबदल्यात नागरिकांना सेवा मनपा देत नाही, असे शिवसेनेचे माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सांगितले होते. तसेच साफसफाई करात पुन्हा वाढ करू नये, असे मतदेखील त्यांनी मांडले होते. मात्र, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर साफसफाई करात वाढ केली होती. त्यानुसार रहिवाशी मालमत्तासाठी दोन तर, व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर चार टक्के करआकारणी नवीन बिलामध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जळगावकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. महापालिका साफसफाई कर वसूल करीत आहे. परंतु त्याबदल्यात पाहिजे त्या पद्धतीने साफसफाई होताना दिसून येत नाही. शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागलेले आहेत. नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत असतांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यात पुन्हा करवाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.