धुळ्यातील घटना
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील साक्रीरोडवरील पद्मनाभ नगरात आई आणि मुलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१) घडली. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळे शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पद्मनाभ नगरातील भाड्याच्या घरात गेल्या सहा महिन्यांपासून रत्नाबाई भटू दुसाने (५०) आणि मुलगा कल्पेश दुसाने (२८) हे दोघे राहत होते. रत्नाबाईला दोन मुले आणि एक मुलगी असून, तिचा मोठा मुलगा शाम विवाहित आहे. तो कुटुंबासह दुसरीकडे वास्तव्यास आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. २०) दुपारी रत्नाबाई व कल्पेश यांनी घराचे दरवाजे बंद करुण कुल चालू ठेवून घराचा दरवाजा बंद केला. यांनतर शनिवारी सकाळी घराचा दरवाजा दुपारी 12 वाजेपर्यत उघडला नसलयाचे शेजा-यांच्या लक्षात आले. आणि दरवाजातून आवाज देवून देखील प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता रत्नाबाई व कल्पेश दोघेजण मृत अवस्थेत आढळून आले.
रत्नाबाईची मुलगी कविता (२१) ही चार-पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्याबाबत पोलिसात तक्रारदेखील देण्यात आली होती. दरम्यान, तिने गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आणि याची माहिती तिच्या आई व भावाला मिळाली. यामुळे आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात नाव बदनाम होऊन प्रतिष्ठा धूळीस गेली या भावनेतून रत्नाबाई व कल्पेश यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा होती.
म. टा. वृत्तसेवा, धुळे
शहरातील साक्रीरोडवरील पद्मनाभ नगरात आई आणि मुलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २१) घडली. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळे शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या पद्मनाभ नगरातील भाड्याच्या घरात गेल्या सहा महिन्यांपासून रत्नाबाई भटू दुसाने (५०) आणि मुलगा कल्पेश दुसाने (२८) हे दोघे राहत होते. रत्नाबाईला दोन मुले आणि एक मुलगी असून, तिचा मोठा मुलगा शाम विवाहित आहे. तो कुटुंबासह दुसरीकडे वास्तव्यास आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. २०) दुपारी रत्नाबाई व कल्पेश यांनी घराचे दरवाजे बंद करुण कुल चालू ठेवून घराचा दरवाजा बंद केला. यांनतर शनिवारी सकाळी घराचा दरवाजा दुपारी 12 वाजेपर्यत उघडला नसलयाचे शेजा-यांच्या लक्षात आले. आणि दरवाजातून आवाज देवून देखील प्रतिसाद न मिळाल्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता रत्नाबाई व कल्पेश दोघेजण मृत अवस्थेत आढळून आले.
रत्नाबाईची मुलगी कविता (२१) ही चार-पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्याबाबत पोलिसात तक्रारदेखील देण्यात आली होती. दरम्यान, तिने गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आणि याची माहिती तिच्या आई व भावाला मिळाली. यामुळे आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात नाव बदनाम होऊन प्रतिष्ठा धूळीस गेली या भावनेतून रत्नाबाई व कल्पेश यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी परिसरात चर्चा होती.