म. टा. प्रतिनिधी, जळगाव
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन सत्राचे दि. १२ ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे.
व्यवस्थापन हा विषय प्रत्येक घटकाशी निगडित असून, व्यवसाय क्षेत्रातील व्यवस्थापनाचे महत्त्व काय असते याकरिता ‘सप्लाय चैन मॅनेजमेंट’या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेला नूतन मुंबई डबावाला असोसिएशनचे सचिव सुभाष तलेकर व रामदास करवंदे उपस्थित राहणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कित्येक नावलौकिक व अगणिक रुपयांची उलाढाल करणारे उद्योग, उद्योजक आहेत.
परंतु, जगप्रसिद्ध मुंबईची ओळख सांगणारे मुंबईचे डबेवाले आहेत. त्यांचे काम, नियोजन, वेळेचे महत्त्व आणि वेगळेपण यामुळे ‘सिक्स सिग्मा’या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. १८९० साली मुंबई डबावाला हा सेवा व्यवसाय सुरू झाला. मुंबईकरांना वेळेवर गरमागरम जेवण पोहचविण्याचे काम मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वीकारले. मुंबईमध्ये दररोज २ लाख लोकांना त्यांच्या योग्य वेळेवर योग्य तोच जेवणाचा डबा पोहचविला जातो. दररोज अगदी रहदारीच्या मार्गाने प्रवास करणारे मुंबईकर आणि त्यांच्यात डबेवाल्यांची कामाची पद्धत त्यांच्याच शब्दात जाणून घेण्याची संधी रायसोनी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संचालिका डॉ. प्रीती अगरवाल यांनी जळगावकरांना केले आहे.
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन सत्राचे दि. १२ ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे.
व्यवस्थापन हा विषय प्रत्येक घटकाशी निगडित असून, व्यवसाय क्षेत्रातील व्यवस्थापनाचे महत्त्व काय असते याकरिता ‘सप्लाय चैन मॅनेजमेंट’या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेला नूतन मुंबई डबावाला असोसिएशनचे सचिव सुभाष तलेकर व रामदास करवंदे उपस्थित राहणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कित्येक नावलौकिक व अगणिक रुपयांची उलाढाल करणारे उद्योग, उद्योजक आहेत.
परंतु, जगप्रसिद्ध मुंबईची ओळख सांगणारे मुंबईचे डबेवाले आहेत. त्यांचे काम, नियोजन, वेळेचे महत्त्व आणि वेगळेपण यामुळे ‘सिक्स सिग्मा’या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. १८९० साली मुंबई डबावाला हा सेवा व्यवसाय सुरू झाला. मुंबईकरांना वेळेवर गरमागरम जेवण पोहचविण्याचे काम मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वीकारले. मुंबईमध्ये दररोज २ लाख लोकांना त्यांच्या योग्य वेळेवर योग्य तोच जेवणाचा डबा पोहचविला जातो. दररोज अगदी रहदारीच्या मार्गाने प्रवास करणारे मुंबईकर आणि त्यांच्यात डबेवाल्यांची कामाची पद्धत त्यांच्याच शब्दात जाणून घेण्याची संधी रायसोनी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संचालिका डॉ. प्रीती अगरवाल यांनी जळगावकरांना केले आहे.