सलग दुसऱ्या महापालिका निवडणुकीत भोपळा
Pravin.Chaudhari@timesgroup.com
Tweet : PravincMT
जळगाव महापालिकेच्या सलग दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खाते उघडता आलेले नाही. पक्षात असलेली गटबाजी व स्थानिक नेत्यांनी दाखविलेली अनास्था यामुळे काँग्रेच्या हातात यंदादेखील भोपळाच आला आहे. राज्यस्तरीय नेत्यांनी इंटरेस्ट दाखविल्यानतंरही स्थानिक नेतांमध्ये आत्मविश्वासच नसल्याने जळगावात काँग्रेसची अवस्था खिळखिळी झाली आहे.
जळगाव महापालिकेची मागील सार्वत्रिक निवडणुक सप्टेंबर २०१३ मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली होती. त्यावेळी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे प्रयत्न करून काँग्रेसला साधे खातेही उघडता आले नव्हते. पाच वर्षांत महापालिकेत एकही नगरसेवक नसल्याने जळगावात काँग्रेसचे अस्तित्व नसल्यासारखेच होते. महापालिकेत हार झाल्यानंतर त्यावेळी आत्मचिंतन बैठक घेऊन जळगावातील नेत्यांनी वरिष्ठस्तरावर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतरही पाच वर्षांत जळगाव महापालिकेत जळगाव जिल्हा व स्थानिक नेत्यांकडून कुठलेही संघटनात्मक कार्य करण्यात आल्याचे आठवत नाही. जळगाव महानगराच्या कार्यध्यक्षापदावर नियुक्ती झालेल्या डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रिक्षा संघटना व इतर शाखा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेतील प्रश्नांवर आंदोलने केली हे काही अपवाद वगळता पाच वर्षात काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणीसाठी ठोस एकत्रित प्रयत्न सर्व नेत्यांकडून झाले नाहीत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने विजयासाठी राष्ट्रवादी व समाजवादी पार्टीशी आघाडी केली. या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या होत्या. यावेळीही काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही.
ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्नही फसला
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी जळगावातील काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यापाठोपाठ सिल्लोड येथिल काँग्रेसचे आमदर अब्दुल सत्तार यांनीदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एक एक प्रभाग दत्तक घ्यावा, प्रत्येकाने आपल्या घरातील एक सदस्य उमेदवार म्हणून उभा करावा, असे आवाहन केले. त्यावेळी नेत्यांनी सत्तार यांच्या आवाहनाला होकार भरला होता.
नेत्यांनी पाठ फिरवताच पदाधिकारी गायब
नेत्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे, आघाडीच्या बैठकांत चर्चा करणे, उमेदवारी अर्ज देणे अशी कामे झाल्यावर तसेच वरिष्ठ नेत्यांची पाठ फिरताच प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात स्थानिक पदाधिकारी गायब झाले होते. उमेदवारी दिल्यनातंर काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी देखिल ठोसपणे हे पदधिकारी थांबले नाहीत. त्यामुळे मागील निवडणुकीसारखीच यंदाही काँग्रेसच्या उमेदवारांची अवस्था झाली होती. निवडणुकीच्या काळात सिल्लोडचे आमदार सत्तार पुन्हा जळगावात आल्यावर त्यांनी ही अवस्था पाहून स्थानिक नेत्यांमधील अनास्थेची कबुली पत्रकारांजवळ दिली होती. तसेच या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वासच नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
आता आत्मविश्वासाची गरज
प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस बैठक घेऊन आत्मचिंतन करीत असते. आता हे आत्मचिंतन पुढील निवडणुकीत पराभूत होण्यासाठीच असते काय? असे कार्यकर्त्यांना वाटायला लागले आहे. काँग्रेसला आता आत्मचिंतनाची नव्हे तर आत्मविश्वासाची गरज आहे. आगामी काळात असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता जळगावात स्थानिक नेते व पदाधिकारी यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून शकेल अशा नेतृत्वाची काँग्रेसला गरज आहे, अन्यथा पराभव व त्यावर आत्मचिंतन करण्याचे काँग्रेसचे हे चक्र असेच कायम राहील.
Pravin.Chaudhari@timesgroup.com
Tweet : PravincMT
जळगाव महापालिकेच्या सलग दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खाते उघडता आलेले नाही. पक्षात असलेली गटबाजी व स्थानिक नेत्यांनी दाखविलेली अनास्था यामुळे काँग्रेच्या हातात यंदादेखील भोपळाच आला आहे. राज्यस्तरीय नेत्यांनी इंटरेस्ट दाखविल्यानतंरही स्थानिक नेतांमध्ये आत्मविश्वासच नसल्याने जळगावात काँग्रेसची अवस्था खिळखिळी झाली आहे.
जळगाव महापालिकेची मागील सार्वत्रिक निवडणुक सप्टेंबर २०१३ मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली होती. त्यावेळी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे प्रयत्न करून काँग्रेसला साधे खातेही उघडता आले नव्हते. पाच वर्षांत महापालिकेत एकही नगरसेवक नसल्याने जळगावात काँग्रेसचे अस्तित्व नसल्यासारखेच होते. महापालिकेत हार झाल्यानंतर त्यावेळी आत्मचिंतन बैठक घेऊन जळगावातील नेत्यांनी वरिष्ठस्तरावर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतरही पाच वर्षांत जळगाव महापालिकेत जळगाव जिल्हा व स्थानिक नेत्यांकडून कुठलेही संघटनात्मक कार्य करण्यात आल्याचे आठवत नाही. जळगाव महानगराच्या कार्यध्यक्षापदावर नियुक्ती झालेल्या डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रिक्षा संघटना व इतर शाखा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेतील प्रश्नांवर आंदोलने केली हे काही अपवाद वगळता पाच वर्षात काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणीसाठी ठोस एकत्रित प्रयत्न सर्व नेत्यांकडून झाले नाहीत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने विजयासाठी राष्ट्रवादी व समाजवादी पार्टीशी आघाडी केली. या आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या होत्या. यावेळीही काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही.
ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्नही फसला
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी जळगावातील काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यापाठोपाठ सिल्लोड येथिल काँग्रेसचे आमदर अब्दुल सत्तार यांनीदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एक एक प्रभाग दत्तक घ्यावा, प्रत्येकाने आपल्या घरातील एक सदस्य उमेदवार म्हणून उभा करावा, असे आवाहन केले. त्यावेळी नेत्यांनी सत्तार यांच्या आवाहनाला होकार भरला होता.
नेत्यांनी पाठ फिरवताच पदाधिकारी गायब
नेत्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे, आघाडीच्या बैठकांत चर्चा करणे, उमेदवारी अर्ज देणे अशी कामे झाल्यावर तसेच वरिष्ठ नेत्यांची पाठ फिरताच प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात स्थानिक पदाधिकारी गायब झाले होते. उमेदवारी दिल्यनातंर काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी देखिल ठोसपणे हे पदधिकारी थांबले नाहीत. त्यामुळे मागील निवडणुकीसारखीच यंदाही काँग्रेसच्या उमेदवारांची अवस्था झाली होती. निवडणुकीच्या काळात सिल्लोडचे आमदार सत्तार पुन्हा जळगावात आल्यावर त्यांनी ही अवस्था पाहून स्थानिक नेत्यांमधील अनास्थेची कबुली पत्रकारांजवळ दिली होती. तसेच या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वासच नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
आता आत्मविश्वासाची गरज
प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस बैठक घेऊन आत्मचिंतन करीत असते. आता हे आत्मचिंतन पुढील निवडणुकीत पराभूत होण्यासाठीच असते काय? असे कार्यकर्त्यांना वाटायला लागले आहे. काँग्रेसला आता आत्मचिंतनाची नव्हे तर आत्मविश्वासाची गरज आहे. आगामी काळात असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता जळगावात स्थानिक नेते व पदाधिकारी यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून शकेल अशा नेतृत्वाची काँग्रेसला गरज आहे, अन्यथा पराभव व त्यावर आत्मचिंतन करण्याचे काँग्रेसचे हे चक्र असेच कायम राहील.