विविध मागण्यांचे निवेदन
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
पाचोरा-भडगाव तालुक्यात ५० टक्के पैशांच्या आत आणेवारी लावून सरसकट दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २०) मोर्चा काढण्यात आला. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सरकार वेळ वाया घालवित असल्याचा आरोपही वाघ यांनी या वेळी बोलताना केला.
या मोर्चात विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संतोष जाधव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सरला पाटील, योजना पाटील, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष किरण देवरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या या मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना देण्यात आले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रांतांनी दिले.
अशा आहेत मागण्या...
पाचोरा व भडगाव तालुक्यात विना निकष दुष्काळ जाहीर करावा, ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी लावावी, शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे, मागील बाकी सक्तीने वसूल करू नये, भारनियमन कमी करावे, ४६ गावांचे बोंड अळीचे अनुदान त्वरित द्यावे, विद्यार्थ्यांना शालेय फी माफ करावी, नादुरुस्त रोहित्र शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत, दिवाळीपूर्वी गिरणेचे आर्वतन सोडावे अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
रावेरला धरणे आंदोलन
रावेर : केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शासनाकडे शेतीला पूरक धोरण नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे, असा आरोप माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अरुण पाटील बोलत होते. डॉ. बाबासोहब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, ओबीसी सेल अध्यक्ष सुनील कोंडे, प्रकाश पाटील, प्रल्हाद बोंडे, पी. आर. पाटील, राजेंद्र चौधरी, माया बारी, समाधान साबळे, शेख महेमुद, योगेश पाटील, दीपक पाटील, लक्ष्मण मोपारी, विलास ताठे आदी उपस्थित होते.
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
पाचोरा-भडगाव तालुक्यात ५० टक्के पैशांच्या आत आणेवारी लावून सरसकट दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २०) मोर्चा काढण्यात आला. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सरकार वेळ वाया घालवित असल्याचा आरोपही वाघ यांनी या वेळी बोलताना केला.
या मोर्चात विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संतोष जाधव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सरला पाटील, योजना पाटील, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष किरण देवरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या या मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना देण्यात आले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रांतांनी दिले.
अशा आहेत मागण्या...
पाचोरा व भडगाव तालुक्यात विना निकष दुष्काळ जाहीर करावा, ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी लावावी, शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे, मागील बाकी सक्तीने वसूल करू नये, भारनियमन कमी करावे, ४६ गावांचे बोंड अळीचे अनुदान त्वरित द्यावे, विद्यार्थ्यांना शालेय फी माफ करावी, नादुरुस्त रोहित्र शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत, दिवाळीपूर्वी गिरणेचे आर्वतन सोडावे अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
रावेरला धरणे आंदोलन
रावेर : केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शासनाकडे शेतीला पूरक धोरण नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे, असा आरोप माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अरुण पाटील बोलत होते. डॉ. बाबासोहब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, ओबीसी सेल अध्यक्ष सुनील कोंडे, प्रकाश पाटील, प्रल्हाद बोंडे, पी. आर. पाटील, राजेंद्र चौधरी, माया बारी, समाधान साबळे, शेख महेमुद, योगेश पाटील, दीपक पाटील, लक्ष्मण मोपारी, विलास ताठे आदी उपस्थित होते.