अ‍ॅपशहर

हादरा लवकरच बसणार

आगामी १५ ते ३० दिवसांत जिल्ह्यासह राज्याला हादरा बसेल असे नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य शनिवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, सोपान पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Times 28 Jan 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rashtrawadi Baithak


आगामी १५ ते ३० दिवसांत जिल्ह्यासह राज्याला हादरा बसेल असे नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य शनिवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, सोपान पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना यवतमाळ ते नागपूरदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेल्या हल्लाबोल आंदोलची माहिती देण्यात आली. मराठवाड्यातील या आंदोलनाची सांगता ३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे होणार असल्याचेही आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले. त्यानंतर पुढचा टप्पा खान्देशचा असून नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात 'हल्लाबोल आंदोलन' होणार असल्याचेही ते म्हणाले.

या हल्लाबोल आंदोलनात १९ फेब्रुवारी रोजी पहिली सभा सकाळी ११ वाजता अमळनेर येथे, दुसरी सभा दुपारी ३ वाजता चोपडा व सायंकाळी ७ वाजता पारोळा येथे सभा होणार आहे. यानंतर २० फेब्रुवारी रोजी ११ वाजता रावेर येथे दुपारी ३ वाजता बोदवडला तर सायंकाळी ७ वाजेला धरणगाव- जळगावला सभा होणार आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जामनेर, पाचोरा दुपारी ३ वाजता तर सायकांळी ७ वाजता चाळीसगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभांना प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आमदार धनंजय मुंडे, दिलीप वळसेपाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्र्यांना वेळ नाही

प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. मात्र अमळनेर येथे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांसाठी येतात, अशी टीकाही डॉ. पाटील यांनी केली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटतट नाहीत. सर्वजण कामाला लागले असून, दोन कार्याध्यक्ष देण्यात येणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात दोन क्षेत्रप्रमुख देणार असून, नवीन कार्य लवकरच जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले.

बंधाऱ्याचा फुगा फुटला

बलून बंधा­ऱ्याची केलेली घोषणा ही फसवी निघाली तसेच केंद्रीय मंत्र्यांनी येऊन केलेली पाहणी ही केवळ पाहणीच ठरली. यामुळे बलून बंधा­ऱ्याचा फुगा फुटला आहे. बोदवड सिंचन योजनेच्या केवळ घोषणा झाल्या प्रत्यक्षात काहिही झालेले नाही,असा आरोपही आमदार डॉ. पाटील यांनी सरकारवर केला. जलसिंचन खाते मिळून चालवता येत नसल्याचा चिमटाही आमदार डॉ. पाटील यांनी मंत्र्यांचे नाव न घेता काढला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज