अ‍ॅपशहर

राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांचा निषेध

नुकत्याच झालेल्या नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी) बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांना डीपीडीसीच्या बैठकीशिवाय भेटू नये, असे वक्तव्य केले. यासाठी लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला आहे.

Maharashtra Times 4 Oct 2018, 5:00 am
जळगाव जिल्हा बंदी करण्याचा पत्रकाद्वारे इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nationalist congress party protest guardian minister chandrakant patil by letter
राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांचा निषेध


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

नुकत्याच झालेल्या नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी) बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांना डीपीडीसीच्या बैठकीशिवाय भेटू नये, असे वक्तव्य केले. यासाठी लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पत्रकाद्वारे निषेध करण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विलंबाने नियोजन मंडळाची बैठक घेतली. त्याचा जाब राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी त्यांना विचारला. यावर पालकमंत्री पाटील यांनी तुम्ही नियोजन मंडळाच्या बैठकीत मला भेटावे इतर वेळेस भेटू नये, असे बेजबाबदार वक्तव्य केल्याचे पत्रकात म्हटले आहे. हा प्रकार लोकप्रतिनिधींचा अपमान असून, पालकमंत्री हे पद केवळ नियोजन मंडळाच्या बैठकीपूरते मर्यादित नसते. जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न पाणी, वीज, आरोग्य यासह विविध विकासकामे याबाबत लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांचे लक्ष वेधून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, त्यात पालकमंत्र्यांचे वक्तव्य बेतालपणाचे व दिशाहीन असल्याने त्यांचा निषेध करीत असल्याचेदेखील या निवेदनात म्हटले आहे.

...तर राजीनामा द्यावा
पालकमंत्री चद्रकांत पाटील यांना जर जळगाव जिल्ह्यासाठी वेळ देता येत नसेल तर त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. आधीच पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, जर त्याचा जाब विचारला तर ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात, पालकमंत्री असेच वागत राहीले तर त्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे. या पत्रकावर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, युवक अध्यक्ष ललित बागूल, विकास पवार, मंगला पाटील, मीनल पाटील, कल्पिता पाटील, नामदेव चौधरी, वाय. एस. महाजन व अरविंद मानकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज