अ‍ॅपशहर

निवेदनावरून मानापमान

‘कर्जमाफीविरोधी फडणवीस सरकार हाय-हाय’, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, अशी संतप्त घोषणाबाजी करत काँग्रेस, राष्ट्रवादीसह सरकारमधील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलन केले. मात्र कर्जमाफीचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी येऊन स्वीकारावे यासाठी सुरू झालेले ठिय्या आंदोलन रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू होते.

Maharashtra Times 11 Apr 2017, 11:47 pm
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nationalist congress party with all opposing parties andolan for farmers issue at jalgaon
निवेदनावरून मानापमान


‘कर्जमाफीविरोधी फडणवीस सरकार हाय-हाय’, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, अशी संतप्त घोषणाबाजी करत काँग्रेस, राष्ट्रवादीसह सरकारमधील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलन केले. मात्र कर्जमाफीचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी येऊन स्वीकारावे यासाठी सुरू झालेले ठिय्या आंदोलन रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू होते. अखेर निंबाळकरांनी खाली येऊन आ. सतीश पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारल्यानंतर हे आंदोलन संपले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), शेकाप, युनायटेड जनता दल या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी मंगळवारी, आकाशवाणी चौकात आंदोलन पुकारले होते. माजी पालकमंत्री आ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी तसेच मंगला पाटील, मीनल पाटील, कल्पना पाटील, अरुणा पाटील, लता मोरे, सविता बोरसे, नीलम पाटील आदी यावेळी उपस्थित होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता केवळ शिष्टमंडळच आत सोडता येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. आ. पाटील यांनाच रोखल्याने त्यांची पोलिस निरीक्षकांशी शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे पाटील यांनी, आम्हाला आत जायचे नाही म्हणत रस्त्यावर थांबत ठिय्या आंदोलन केले.

तुम्ही, राजेच…तुम्हाला मानाचा मुजरा

जिल्हाधिकारी निंबाळकर आणि आमदार पाटील यांच्यातील अप्रत्यक्ष सामना यावेळी पाहायला मिळाला. रात्री ९.३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, तेव्हा ‘तुम्ही राजे आहात, राजेसारखेच वागलात…तुम्हाला मानाचा मुजरा’ असा टोला आ. पाटील यांनी त्यांना लगावला. तुम्ही लोकप्रतिनींचा अवमान केला असून विधानसभेत हक्कभंग आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज