अॅडमिरल सुनील भोकरे यांचे प्रतिपादन
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभला असून, सर्वात जास्त आयात आणि निर्यातदेखील सागरी मार्गाने होते. शेजारी राष्ट्राशी संबंध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील अतिवृष्टी व पूरासारख्या आपात्कालीन स्थितीतदेखील नौसेनेला भूमिका बजवावी लागते. त्यामुळे नौसेनेचे कार्य देशासाठी मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी केले.
भडगाव तालुक्यातील गुढे येथे मंगळवारी (दि. २८) आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. आपल्या मनोगतात अॅडमिरल भोकरे यांनी आपल्या खडतर वाटचाली बद्दलची माहिती देत गावातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. आपल्या देशात ९० टक्के व्यापार हा समुद्रामार्गे होतो. त्यामुळे नौसेनाला खूप महत्त्व आहे. ७८ टक्के पेट्रोल व डिझेल समुद्र मार्गाने येते. देशात पूरजन्यस्थिती निर्माण झाल्यावरदेखील नौसेनेला बोलविले जात असल्याचेही ते म्हणाले. नौसेनेत वेळेलादेखील फार महत्त्व असते. नौसेनेला दरवर्षी १०० ते १२५ कॅडेटस् तयार करावे लागतात. अशा नौसेनेच्या विविध पैलूंविषयी माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना नौसेनेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केले.
गावाकडून खूप शिकलो
मला गावाकडून मला ख्ाूप काही शिकायला मिळाले. माझे पहिली ते चौथीचे शिक्षण नागद, बोलठाण, नांदगाव या गावी झाले. पाचवीच्या वर्गात असताना त्यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर त्यानी खडकवासला येथे ट्रेनिंग घेतली. त्यांना रशिया पाठविण्यात आले तेथे त्यांनी पाणबुडीचे प्रशिक्षण घेत नंतर त्याची जहाजावर नियुक्ती झाली, अशा सर्व ठिकाणचे अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर, आमदार किशोर पाटील, सभापती हेमलता पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. सत्कारापूर्वी गावातून अॅडमिरल सुनील भोकरे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभला असून, सर्वात जास्त आयात आणि निर्यातदेखील सागरी मार्गाने होते. शेजारी राष्ट्राशी संबंध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील अतिवृष्टी व पूरासारख्या आपात्कालीन स्थितीतदेखील नौसेनेला भूमिका बजवावी लागते. त्यामुळे नौसेनेचे कार्य देशासाठी मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी केले.
भडगाव तालुक्यातील गुढे येथे मंगळवारी (दि. २८) आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. आपल्या मनोगतात अॅडमिरल भोकरे यांनी आपल्या खडतर वाटचाली बद्दलची माहिती देत गावातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. आपल्या देशात ९० टक्के व्यापार हा समुद्रामार्गे होतो. त्यामुळे नौसेनाला खूप महत्त्व आहे. ७८ टक्के पेट्रोल व डिझेल समुद्र मार्गाने येते. देशात पूरजन्यस्थिती निर्माण झाल्यावरदेखील नौसेनेला बोलविले जात असल्याचेही ते म्हणाले. नौसेनेत वेळेलादेखील फार महत्त्व असते. नौसेनेला दरवर्षी १०० ते १२५ कॅडेटस् तयार करावे लागतात. अशा नौसेनेच्या विविध पैलूंविषयी माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना नौसेनेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केले.
गावाकडून खूप शिकलो
मला गावाकडून मला ख्ाूप काही शिकायला मिळाले. माझे पहिली ते चौथीचे शिक्षण नागद, बोलठाण, नांदगाव या गावी झाले. पाचवीच्या वर्गात असताना त्यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर त्यानी खडकवासला येथे ट्रेनिंग घेतली. त्यांना रशिया पाठविण्यात आले तेथे त्यांनी पाणबुडीचे प्रशिक्षण घेत नंतर त्याची जहाजावर नियुक्ती झाली, अशा सर्व ठिकाणचे अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर, आमदार किशोर पाटील, सभापती हेमलता पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. सत्कारापूर्वी गावातून अॅडमिरल सुनील भोकरे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.