अ‍ॅपशहर

संविधान साक्षरतेची चळवळ हवी

समतेच्या चळवळीचे एक वर्तुळ तयार झाले असून, या वर्तूळाच्या सुरू असलेल्या जातीधर्माच्या संघर्षापलिकडे युवकांनी विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये संविधान साक्षरतेची चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अंजली मायदेव आंबेडकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या बीजभाषणात त्यांनी हे विचार मांडले.

Maharashtra Times 25 Sep 2017, 4:00 am
विचार संमेलनात डॉ. अंजली मायदेव आंबेडकर यांची अपेक्षा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम needs constitutional literacy movement
संविधान साक्षरतेची चळवळ हवी


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

समतेच्या चळवळीचे एक वर्तुळ तयार झाले असून, या वर्तूळाच्या सुरू असलेल्या जातीधर्माच्या संघर्षापलिकडे युवकांनी विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये संविधान साक्षरतेची चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अंजली मायदेव आंबेडकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या बीजभाषणात त्यांनी हे विचार मांडले.

प्रगतशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव जिल्हा महिला असोसिएशन व समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २४) कांताई सभागृहात सहावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रीपाद जोशी, महिला असोसिएशनच्या राजकमल पाटील, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, साजिद पटेल, मुकुंद सपकाळे उपस्थित होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यानंतरदेखील समाजावर जाती धर्मांचा पगडा असून, समतेच्या चळवळीचे एक वर्तुळ तयार झाले आहे. त्यांच्यापलिकडे युवकांनी विचार करणे आवश्यक असून, संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे, असे यावेळी विचार व्यक्त करताना डॉ. आंबेडकर म्हणाल्या. या नवीन पिढीकडून जातीयवाद व धर्मवाद यावरच विचार केले जात असतात. मात्र या विचारांपलीकडे जावून समतावादी विचारांची वाटचाल व्हावे, असेही त्या म्हणाल्या. युवकांनी चळवळीची व्युत्पत्ती ही प्रबुद्ध भारतापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. वैचारिक अभ्यासक्रम रद्द करून सरकारकडून विद्यार्थ्यांच्या विचारांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला.

संविधान व्यापक

नवभारताच्या पायाभरणीचे संविधान व्यापक असून, आपण सारे आंबेडकर परिवार आहोत. देशात संविधान साक्षर चळवळ उभारण्याची आज गरज असल्याचे मत संमेलनाच्या भूमिकेतून डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. आभार डॉ. मिलिंद बागूल यांनी मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज