अप्पर सचिव प्रवीण परदेशींचे मत
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जो व्यक्ती अनेक वर्षांपासून जंगलात राहतो त्याला उपेक्षित ठेवून पर्यावरण, जंगल संवर्धन करणे अशक्य, असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले. विश्व आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ११) आयोजित आदिवासी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कांताई सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर माजीमंत्री पद्माकर वळवी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नंदुरबारचे जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी, फॉरेस्ट अधिकारी आदर्शकुमार रेड्डी, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, अभिनेता यशपाल शर्मा, प्रतिभा शर्मा, विजया अहिरराव, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शंभू पाटील, मुकूंद सपकाळे, अरूणाताई चौधरी, यमुनाबाई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांकडून मातीत बाण खोचून करण्यात आली. तसेच पारंपरिक आदिवासी नृत्यही सादर करण्यात आले. आदिवासी बांधव आपली जमीन, जंगल, पाण्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. गेल्या ५ हजार वर्षापूर्वीची त्यांची परंपरा ते जोपासत आहेत. लोकसंघर्षच्या कामातून पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहे, आदिवासी बांधवांनी स्वत:च्या मालकीची जमीन ही भावना मनात ठेवून एकजूट होऊन नवा आराखडा तयार केला पाहिजे, असेही परदेशी यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांना धरती आबा बिरसा मुंडा पुरस्कारात धनुष्यबाण, बीज टोकरी, सन्मानचिन्ह, मानपत्र असे देण्यात आले. तसेच मल्लिनाथ्ा कलशेट्टी यांना क्रांतिवीर ख्वॉजा पुरस्कार, शिरीष चौधरी यांना आदिवासी रत्न पुरस्कार, डॉ.विजय अहिरराव, प्रतिभा शर्मा यांना आदिवासी मित्र पुरस्कार देण्यात आला.
जमीन विकू नका
आदिवासी बांधवांनी जमिनीचे संरक्षण केले पाहिजे. उपाशी रहा पण जमीन विकू नका, असा सल्ला माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी यावेळी बोलताना दिला. हिंसेच्या मार्गाने विकास होत नसून, अहिंसेने विकास शक्य आहे, असेही वळवी म्हणाले. यावेळी बोलताना अशोक जैन यांनीही आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केले पाहीजे या भावनेतून जैन समूहाचे काम सुरू असल्याचे सांगितले. यासाठी शेतीतील नवतंत्रज्ञान कसे उपलब्ध करता येईल याबाबत विचार सुरू असून, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही जैन म्हणाले.
शोभायात्रेने वेधले लक्ष
कार्यक्रमाच्या आधी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून शोभायात्रा काढण्यात आली. रेल्वे स्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत शोभायात्रा नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थावर पोहचली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तेथून नवीन बस स्थानक भजीगल्लीमार्गे शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहचली. या रॅलीत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीच्या अग्रभागी सुशोभित केलेले ट्रॅक्टर होते. या ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बिरसा मुंडा, क्रांतिवीर ख्वॉज नाईक, हल्दीबाई भील, तंट्या भील, क्रांतिवीर राघोजी भांगरे आदी वीरांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जो व्यक्ती अनेक वर्षांपासून जंगलात राहतो त्याला उपेक्षित ठेवून पर्यावरण, जंगल संवर्धन करणे अशक्य, असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले. विश्व आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ११) आयोजित आदिवासी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कांताई सभागृहात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर माजीमंत्री पद्माकर वळवी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नंदुरबारचे जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी, फॉरेस्ट अधिकारी आदर्शकुमार रेड्डी, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, अभिनेता यशपाल शर्मा, प्रतिभा शर्मा, विजया अहिरराव, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शंभू पाटील, मुकूंद सपकाळे, अरूणाताई चौधरी, यमुनाबाई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांकडून मातीत बाण खोचून करण्यात आली. तसेच पारंपरिक आदिवासी नृत्यही सादर करण्यात आले. आदिवासी बांधव आपली जमीन, जंगल, पाण्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. गेल्या ५ हजार वर्षापूर्वीची त्यांची परंपरा ते जोपासत आहेत. लोकसंघर्षच्या कामातून पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहे, आदिवासी बांधवांनी स्वत:च्या मालकीची जमीन ही भावना मनात ठेवून एकजूट होऊन नवा आराखडा तयार केला पाहिजे, असेही परदेशी यांनी सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांना धरती आबा बिरसा मुंडा पुरस्कारात धनुष्यबाण, बीज टोकरी, सन्मानचिन्ह, मानपत्र असे देण्यात आले. तसेच मल्लिनाथ्ा कलशेट्टी यांना क्रांतिवीर ख्वॉजा पुरस्कार, शिरीष चौधरी यांना आदिवासी रत्न पुरस्कार, डॉ.विजय अहिरराव, प्रतिभा शर्मा यांना आदिवासी मित्र पुरस्कार देण्यात आला.
जमीन विकू नका
आदिवासी बांधवांनी जमिनीचे संरक्षण केले पाहिजे. उपाशी रहा पण जमीन विकू नका, असा सल्ला माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी यावेळी बोलताना दिला. हिंसेच्या मार्गाने विकास होत नसून, अहिंसेने विकास शक्य आहे, असेही वळवी म्हणाले. यावेळी बोलताना अशोक जैन यांनीही आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केले पाहीजे या भावनेतून जैन समूहाचे काम सुरू असल्याचे सांगितले. यासाठी शेतीतील नवतंत्रज्ञान कसे उपलब्ध करता येईल याबाबत विचार सुरू असून, आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही जैन म्हणाले.
शोभायात्रेने वेधले लक्ष
कार्यक्रमाच्या आधी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून शोभायात्रा काढण्यात आली. रेल्वे स्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत शोभायात्रा नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थावर पोहचली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तेथून नवीन बस स्थानक भजीगल्लीमार्गे शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहचली. या रॅलीत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीच्या अग्रभागी सुशोभित केलेले ट्रॅक्टर होते. या ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बिरसा मुंडा, क्रांतिवीर ख्वॉज नाईक, हल्दीबाई भील, तंट्या भील, क्रांतिवीर राघोजी भांगरे आदी वीरांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.