एक मार्ग बंदवरून रेल्वे, मनपाचे एकमेकांकडे बोट
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महापालिकेने दिलेल्या निधीतूनच रेल्वे प्रशासनाने बजरंग बोगद्याशेजारी दोन समांतर रस्त्यांचे काम मार्च महिन्यात पूर्ण केले आहे. मात्र, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने एकाच बोगद्यातून सध्या वाहतूक सुरू आहे. साचलेले पाणी काढणे व स्वच्छता करण्याचे काम कुणी करावे यावरून रेल्वे व महापालिकेने एकमेकांकडे बोट दाखविल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेले बोगदे ‘शो-पीस’ ठरू पाहत आहे. या ठिकाणी लवकरच कायमस्वरूपी पंप बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाकडून बोगदा तयार करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडे दिले होते. त्यासाठी मनपाने ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी रेल्वे प्रशासनाला दिला होता. रेल्वेने सात ते आठ महिन्यात नवीन बोगदे तयार करण्याचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केले. नवीन बोगद्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार असल्याने बोगद्याचा दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून इतर कामही करण्यात आले. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने बोगद्यामध्ये पाणी साचल्याने ते वापरता येत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही तरी दोन समांतर बोगद्यामधील एकच बोगदाच वापरला जात आहे. तर दुसऱ्या बोगद्यात साचलेले पाणी व गाळ असल्याने तो वापरला जात नाही. याबाबत महापालिका प्रशासनाने रेल्वे विभागाकडे विचारणा केली असता, पालिकेने स्वच्छता करून दुसरा बोगदा सुरू करावा, असे सांगितले आहे. तर पालिकेने त्यांना साचलेले पाणी काढण्याच्या सूचना केल्या. मात्र, रेल्वेकडून या ठिकाणी पालिकेकडून कायमस्वरूपी पंप बसवावा व साचलेले पाणी उपसण्याची उपाययोजना करावी, असे सांगण्यात आले आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महापालिकेने दिलेल्या निधीतूनच रेल्वे प्रशासनाने बजरंग बोगद्याशेजारी दोन समांतर रस्त्यांचे काम मार्च महिन्यात पूर्ण केले आहे. मात्र, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने एकाच बोगद्यातून सध्या वाहतूक सुरू आहे. साचलेले पाणी काढणे व स्वच्छता करण्याचे काम कुणी करावे यावरून रेल्वे व महापालिकेने एकमेकांकडे बोट दाखविल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेले बोगदे ‘शो-पीस’ ठरू पाहत आहे. या ठिकाणी लवकरच कायमस्वरूपी पंप बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाकडून बोगदा तयार करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडे दिले होते. त्यासाठी मनपाने ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी रेल्वे प्रशासनाला दिला होता. रेल्वेने सात ते आठ महिन्यात नवीन बोगदे तयार करण्याचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केले. नवीन बोगद्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार असल्याने बोगद्याचा दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून इतर कामही करण्यात आले. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने बोगद्यामध्ये पाणी साचल्याने ते वापरता येत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही तरी दोन समांतर बोगद्यामधील एकच बोगदाच वापरला जात आहे. तर दुसऱ्या बोगद्यात साचलेले पाणी व गाळ असल्याने तो वापरला जात नाही. याबाबत महापालिका प्रशासनाने रेल्वे विभागाकडे विचारणा केली असता, पालिकेने स्वच्छता करून दुसरा बोगदा सुरू करावा, असे सांगितले आहे. तर पालिकेने त्यांना साचलेले पाणी काढण्याच्या सूचना केल्या. मात्र, रेल्वेकडून या ठिकाणी पालिकेकडून कायमस्वरूपी पंप बसवावा व साचलेले पाणी उपसण्याची उपाययोजना करावी, असे सांगण्यात आले आहे.