अ‍ॅपशहर

विकासकामांना ‘ब्रेक’

महापालिकेसाठी मंजूर झालेल्या मुख्यमंत्री निधीतील २५ कोटीसह विविध ४० कोटींच्या विकासकामे येत्या महिन्यात प्रस्ताव मंजुरी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आता या कामांना ब्रेक लागणार आहे. तसेच पुढच्याच महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने ही कामे आता चार महिने लांबणार असल्याने जळगावकरांची ससेहोलपट अजून सुरुच राहाणार आहे.

Maharashtra Times 26 May 2018, 5:00 am
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता; पालिकेची ४० कोटींची कामे लांबणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no development works should be done due to teacher constituency election code of conduct
विकासकामांना ‘ब्रेक’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेसाठी मंजूर झालेल्या मुख्यमंत्री निधीतील २५ कोटीसह विविध ४० कोटींच्या विकासकामे येत्या महिन्यात प्रस्ताव मंजुरी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आता या कामांना ब्रेक लागणार आहे. तसेच पुढच्याच महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने ही कामे आता चार महिने लांबणार असल्याने जळगावकरांची ससेहोलपट अजून सुरुच राहाणार आहे.

गेल्या चार वर्षांत महापालिकेची परिस्थिती बिकट असल्याने ठोस विकासकामे झालेली नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेल्या मतभेदांमुळे या निधीतील कामेही वर्षभर रखडली. नुकतीच यातील १८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. मात्र, आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. याबाबत सरकारचे अध्यादेश आले नसले तरी आचारसंहितेमुळे कार्यादेश देता येणार नाही. तसेच नवीन कामेही करता येणार नाही.

निवडणूक प्रक्रियापूर्व हालचालींना सुरुवात
विशेष म्हणजे, पुढच्या महिन्यात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात देखिल नविन कामे करु नयेत अश्या शासनाच्या सूचना असल्याने या कामांसाठी संपूर्ण चार महीने प्रतिक्षा करावी लागणार आहे.जळगाव महापालिकेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महीन्यात संपणार आहे. त्यामुळे आगस्ट मध्ये पुढील पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने निवडणूक प्रक्रियापूर्व हालचालींना सुरुवात केली आहे. त्यामुळे जून महिन्याअखेर किंवा जुलैच्या सुरुवातीला निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेही ही कामे रेंगाळण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज