पालिका कर्मचारी संघटनेचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गाळे ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार नाही. तो पर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा मनपा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून १७ प्रभागांमध्ये साफसफाई केली जाते तर इतर २० प्रभागांमध्ये मक्तेदाराकडून सफाईचे काम केले जाते. त्यामुळे शहरातील १७ प्रभागांमधील सफाईचे कामदेखील थांबणार असून, कोणत्याही भागातील कचरा उचलला जाणार नाही. तसेच मक्तेदारांकडूनदेखील या बंदला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३५ घंटागाड्या, १० ट्रॅक्टर, ४ डंपर, जेसीबीचे कामही बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा व अग्निशमन सुरू
मनपा कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या बंद काळात पाणीपुरवठा बंद ठेवावा की नाही, याबाबत मनपा तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून अद्याप निर्णय झाला नाही. तरी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनातून पाणीपुरवठा वगळला असल्याचे समजते. त्यामुळे आंदोलनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. तसेच अग्निशमन विभागही सुरू राहणार आहे.
शाळांचे कामही बंद
महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा घोषीत केला आहे. त्यामुळे शाळा व शाळांचे कामकाजही बंद राहणार आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून महापालिकेचे शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे पालिकेकडून देण्यात येणारे ५० टक्के वेतनपोटी सुमारे २२ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. त्यामुळे आता शाळांनाही या बंदचा फटका बसणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गाळे ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार नाही. तो पर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा मनपा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून १७ प्रभागांमध्ये साफसफाई केली जाते तर इतर २० प्रभागांमध्ये मक्तेदाराकडून सफाईचे काम केले जाते. त्यामुळे शहरातील १७ प्रभागांमधील सफाईचे कामदेखील थांबणार असून, कोणत्याही भागातील कचरा उचलला जाणार नाही. तसेच मक्तेदारांकडूनदेखील या बंदला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३५ घंटागाड्या, १० ट्रॅक्टर, ४ डंपर, जेसीबीचे कामही बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा व अग्निशमन सुरू
मनपा कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या बंद काळात पाणीपुरवठा बंद ठेवावा की नाही, याबाबत मनपा तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून अद्याप निर्णय झाला नाही. तरी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनातून पाणीपुरवठा वगळला असल्याचे समजते. त्यामुळे आंदोलनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. तसेच अग्निशमन विभागही सुरू राहणार आहे.
शाळांचे कामही बंद
महापालिका कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने पाठिंबा घोषीत केला आहे. त्यामुळे शाळा व शाळांचे कामकाजही बंद राहणार आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून महापालिकेचे शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे पालिकेकडून देण्यात येणारे ५० टक्के वेतनपोटी सुमारे २२ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. त्यामुळे आता शाळांनाही या बंदचा फटका बसणार आहे.