अ‍ॅपशहर

‘गांधी’ विचारांशिवाय पर्याय नाही

गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे. मात्र, आजची सर्वच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही, असे ठाम मत डॉ. विश्वास पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते.

Maharashtra Times 28 Sep 2018, 5:00 am
डॉ. विश्वास पाटील यांचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG_20180927_101930


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे. मात्र, आजची सर्वच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही, असे ठाम मत डॉ. विश्वास पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले. गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते.

‘गांधी प्रासंगिकता का मर्म’ या विषयावर डॉ. विश्वास पाटील यांनी विचार व्यक्त केले. वीस राज्यांतून आलेल्या तरुणांसमोर डॉ. विश्वास पाटील यांनी गांधीजींच्या तरुणपणातील अनेक उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते पुढे म्हणाले, तरुणाई ही शक्ती आहे, प्रवाह आहे. तरुणपण ही वृत्ती आहे, वय नाही. ज्यांचे खांदे मजबूत आहेत आणि डोके काम करतेय तो ‘युवा’. ज्याला येणाऱ्या काळाच्या पल्याड पाहता येते तो ‘तरुण’, अशी व्याख्या डॉ. पाटील यांनी केली.

स्वत: एकटे उभे राहण्यात धैर्य लागते, हे धैर्य महात्मा गांधी यांनी दाखवले होते. ते एकट्यानेच लढायला निघाले होते, समाजातील लोकं हे नंतर त्यांच्या पाठीशी उभे राहत गेले. महात्मा गांधी यांची प्रासंगिकता का आहे, हा प्रश्न आपल्याकडे उपस्थित केला जातो, हे दुर्दैवच आहे. जेव्हा की जगभरातील शंभर देशांत ‘बा-बापू १५०’ हा उत्सव साजरा केला जाणार आहे. इतर देशात गांधीजी हे प्रासंगिक होत नाहीत, असेही डॉ. विश्वास पाटील यांनी सांगितले.

खादीच्या वापरातून स्वावलंबनाचा मंत्र
गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून डॉ. पाटील पुढे म्हणाले, गांधीजींच्या जीवनात प्रामाणिकता होती. सत्य होते. सत्य ही जीवनधारा आहे, वर्तमानाला आकार देणारे आहे. वर्तमानात जगणाऱ्यांना कसलाही त्रास होत नाही. खादीच्या वापरातून त्यांनी स्वावलंबनाचा मंत्र दिला तर उपवासातून संयमाची शिकवण दिली. गांधीजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मातृसत्ता, गुरूसत्ता, पंचसत्ता, शास्त्रसत्ता आणि शस्त्रसत्तेला विरोध केला. या वेळी उपस्थित युवकांनीदेखील विविध प्रश्न विचारून गांधीजींच्या संदर्भातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. युवकांच्या काही प्रश्नांना महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील उत्तरे दिली. सुरुवातीला गांधी रिसर्च फाउंडेशनचे जॉन चेल्लादुराई यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अश्विन झाला यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज