अ‍ॅपशहर

पोलिस स्थानकातच पडल्या लग्नाच्या बेड्या

चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरहून एका लग्नात भेट होऊन पसार झालेल्या प्रेमीयुगलाला ग्रामीण पोलिसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. ते दोघेही सज्ञान व एकमेकांच्या नात्यातील असल्याने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या प्रेमीयुगलाच्या आई-वडील व नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकवित लग्नाच्या बेड्या ठोकल्या.

Maharashtra Times 24 Apr 2018, 4:00 am
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या साक्षीने प्रेमीयुगल विवाहबंधनात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chalisgaon lagna


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील हिरापूरहून एका लग्नात भेट होऊन पसार झालेल्या प्रेमीयुगलाला ग्रामीण पोलिसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. ते दोघेही सज्ञान व एकमेकांच्या नात्यातील असल्याने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या प्रेमीयुगलाच्या आई-वडील व नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकवित लग्नाच्या बेड्या ठोकल्या.

एका विवाह समारंभाच्या कार्यक्रमासाठी चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर दि. १५ एप्रिल रोजी येथे सुनील दिगंबर पवार (वय २५, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक) चा तरुण आला होता. या तरुणाचे लग्नात भाग्यश्री सुकराम चव्हाण (वय १९, वजीरखेडे ता. मालेगाव) ही तरुणी आत्याकडे आपल्या आईवडीलांसह आली होती. या तरुणीसोबत सुनीलचे सूत जूळले. या प्रेमीयुगलाने तेथून पळून जाऊन शेगाव मठात एकमेकांना वरमाला टाकल्या. या घटनेनंतर दोघांच्या पालकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद दाखल केली होती.

धुळ्यातून घेतले ताब्यात
पोलिस बेपत्ता प्रेमीयुगलाचा शोध घेत असताना ते धुळे येथे पोहचल्याची माहिती मिळाली. तातडीने चाळीसगाव पोलिसांनी तेथून या दोघांना ताब्यात घेत सोमवारी (दि. २३) दुपारी ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्या दोघांनी आपली प्रेमकथा पोलिसांसमोर मांडत वेगळे होण्यास नकार दिला. दोघंही सज्ञान असल्याने पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप वाल्हे, पोलिस हवालदार हिरामण तायडे, गणपत महिरे, मनोज पाटील, महेंद्र सांळुखे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दुपारी पोलिस स्टेशनलाच कर्मचाऱ्यांच्या साक्षीने या प्रेमीयुगलाचे आईवडील व नातेवाईकांच्या उपस्थितीत शुभमंगल लावून देण्यात आले. या वेळी पोलीस हवालदार किशोर पाटील, शंकर जनजाळे, महिला पोलिस कर्मचारी सब्बा शेख, मुलाचे वडील दिगंबर पवार, मामा मच्छिंद्र चव्हाण, शंकर चव्हाण, मुलीचे वडील सुकराम चैत्राम सूर्यवंशी उपस्थित होते. या विवाहाची वालझरी संस्थानमधील रजिस्टरमध्ये कायदेशीर नोंद केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रदीप वाल्हे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज