म. टा. प्रतिनिधी, जळगाव
पथराड गावाजवळ असलेल्या शेतात मंदाकिनी सुभाष तरस (वय १५) ही आपल्या आई-वडिलांसोबत कामाला गेली होती. शेतातील ७० फूट खोल विहिरीतून पाणी काढत असताना मंदाकिनी तोल जाऊन विहिरीत पडली. वडील सुभाष तरस यांनी लागलीच विहिरीत उडी मारत मुलीचे प्राण वाचविले.
चौघांना सर्पदंश
पाळधी येथील रहिवासी जयसिंग पावरा (२८) हे शेतात काम करीत असतांना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आलेल्या सापाने चावा घेतला. धरणगांव तालुक्यातील काकडी गावातील चंद्रकांत ज्ञानेश्वर सोनवणे (२७), राणीचे बांबरूड येथील युवराज दौलत वाघ (४५), भारूळखेडा येथील नारायण पाटील (३२) यांनादेखील सापाने चावा घेतला.
पथराड गावाजवळ असलेल्या शेतात मंदाकिनी सुभाष तरस (वय १५) ही आपल्या आई-वडिलांसोबत कामाला गेली होती. शेतातील ७० फूट खोल विहिरीतून पाणी काढत असताना मंदाकिनी तोल जाऊन विहिरीत पडली. वडील सुभाष तरस यांनी लागलीच विहिरीत उडी मारत मुलीचे प्राण वाचविले.
चौघांना सर्पदंश
पाळधी येथील रहिवासी जयसिंग पावरा (२८) हे शेतात काम करीत असतांना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आलेल्या सापाने चावा घेतला. धरणगांव तालुक्यातील काकडी गावातील चंद्रकांत ज्ञानेश्वर सोनवणे (२७), राणीचे बांबरूड येथील युवराज दौलत वाघ (४५), भारूळखेडा येथील नारायण पाटील (३२) यांनादेखील सापाने चावा घेतला.