उपवनरक्षक डिगंबर पवार यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्याला ३३ कोटीवृक्ष लागवड अंतर्गत देण्यात आलेले ९३ लाख ४३ हजार १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आता १ कोटी ७ लाख ३२२ करण्यात आले आहे. तसेच २०१८ ला लागवड केलेल्या झाडांपैकी ७८. २८ टक्के रोप जिवंत असल्याची माहिती जळगाव उपवनरक्षक डिंगबर पगार यांनी दिली.
जळगाव वनविभागातर्फे वृक्षलागवड अभियान अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी यावल उपवनरक्षक पी. टी. मोरणकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उदय सोनवणे आदी उपस्थित होते. वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील ४७ शासकीय विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना वेगवेगळे उद्दिष्ट दिले आहेत. त्यानुसार जळगाव वनविभागास १३ लाख ७० हजार, यावल वनविभागास २६ लाख ६९ हजार तर जळगाव महापालिकेस २५ हजार ३०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.
यावर्षी वृक्ष लागवड कोठे करणार आहे याची माहिती जीपीएसच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. तसेच जेथे वृक्षलागवड करण्यात येईल तेथे खड्डे खोदण्याचे काम दि. ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जुलै महिन्यात तेथे प्रत्यक्ष वृक्षलागवड करण्यात येईल. ज्या शासकीय विभागाला वृक्षलागवडीसाठी जमिन उपलब्ध नसेल त्यास वनविभागातर्फे नदी काठची सुमारे १ किमी. पर्यंतची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जिवंत वृक्षलागवड टक्केवारी...
२०१६ ....६२.३३ टक्के
२०१७ ....७५.२० टक्के
२०१८ ....७८.२८ टक्के
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्याला ३३ कोटीवृक्ष लागवड अंतर्गत देण्यात आलेले ९३ लाख ४३ हजार १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आता १ कोटी ७ लाख ३२२ करण्यात आले आहे. तसेच २०१८ ला लागवड केलेल्या झाडांपैकी ७८. २८ टक्के रोप जिवंत असल्याची माहिती जळगाव उपवनरक्षक डिंगबर पगार यांनी दिली.
जळगाव वनविभागातर्फे वृक्षलागवड अभियान अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी यावल उपवनरक्षक पी. टी. मोरणकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उदय सोनवणे आदी उपस्थित होते. वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील ४७ शासकीय विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना वेगवेगळे उद्दिष्ट दिले आहेत. त्यानुसार जळगाव वनविभागास १३ लाख ७० हजार, यावल वनविभागास २६ लाख ६९ हजार तर जळगाव महापालिकेस २५ हजार ३०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.
यावर्षी वृक्ष लागवड कोठे करणार आहे याची माहिती जीपीएसच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. तसेच जेथे वृक्षलागवड करण्यात येईल तेथे खड्डे खोदण्याचे काम दि. ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जुलै महिन्यात तेथे प्रत्यक्ष वृक्षलागवड करण्यात येईल. ज्या शासकीय विभागाला वृक्षलागवडीसाठी जमिन उपलब्ध नसेल त्यास वनविभागातर्फे नदी काठची सुमारे १ किमी. पर्यंतची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जिवंत वृक्षलागवड टक्केवारी...
२०१६ ....६२.३३ टक्के
२०१७ ....७५.२० टक्के
२०१८ ....७८.२८ टक्के