जिल्हा नियोजन बैठक; बिबट्याच्या बंदोबस्ताची पालकमंत्र्यांची ग्वाही
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
चाळीसगाव तालुक्यात ६ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्यासाठी रेस्क्यू टीमसह यंत्रणा सक्रिय झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. ४) दिली. बैठकीत १०६४.४२ कोटींचा प्रारूप आराखडाही मंजूर करण्यात आला.
सोमवारी (दि. ४) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील अडचणी मांडल्या. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा ऊहापोह केला.
बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या वेळी बोलताना आमदार उन्मेष पाटील यांनी, नियोजनाच्या माध्यमातून ४४१.५५ कोटी रुपये मर्यादा जिल्ह्यासाठी उपलब्ध असून, १ हजार ४२ कोटींची मागणी जनसुधारणा, जनसंवर्धन, ग्रामसडक योजना, नगरविकास आदी माध्यमांतून केली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात १४६ कोटीचा आराखडा मंजूर झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या वेळी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे व नगरपरिषदांमधून नियुक्त नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.
अधिकाऱ्यांकडून दिशाभूल
आमदार सावकारे यांनी जलसंधारण कामासंदर्भात आक्षेप घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे जलसंधारण स्थानिक स्तर व जलसंधारण यांच्या कामात सरमिसळ करून जि. प. सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी हे कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करायला जातात, अशी तक्रारही सावकारे यांनी यावेळी केली. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपाला न घाबरता कामांची तपासणी करावी, असे सांगितले. चाळीसगाव तालुक्यातदेखील कोणतेही काम प्रत्यक्ष झालेले नसताना रस्त्याची कामे कागदावरच करून निधी काढला गेला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड-म्हाळसा येथील सरपंचांनी केलेल्या तक्रारीचेदेखील अधिकाऱ्यांनी वा पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेना
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे ३.४१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी या बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभागांतर्गत नियोजन विभागातून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केली. हा प्रश्न विधीमंडळात चर्चेला घेवून मदतीसाठी तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून या कंपन्यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी चर्चादेखील करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. बोंडअळीच्या कपाशी नुकसानीसाठी अर्ज भरण्याची मुदत ५ डिसेंबर असून, ती वाढविण्यात यावी तसेच पीक संवर्धन योजनेंतर्गत काही निधी देण्यात येत असेल तर त्याचे नियोजन करावे, अशी मागणीही आमदार डॉ. पाटील यांनी केली. यावर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पीक संवर्धन योजनेंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचेही त्यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
चाळीसगाव तालुक्यात ६ जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्यासाठी रेस्क्यू टीमसह यंत्रणा सक्रिय झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. ४) दिली. बैठकीत १०६४.४२ कोटींचा प्रारूप आराखडाही मंजूर करण्यात आला.
सोमवारी (दि. ४) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील अडचणी मांडल्या. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा ऊहापोह केला.
बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या वेळी बोलताना आमदार उन्मेष पाटील यांनी, नियोजनाच्या माध्यमातून ४४१.५५ कोटी रुपये मर्यादा जिल्ह्यासाठी उपलब्ध असून, १ हजार ४२ कोटींची मागणी जनसुधारणा, जनसंवर्धन, ग्रामसडक योजना, नगरविकास आदी माध्यमांतून केली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात १४६ कोटीचा आराखडा मंजूर झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या वेळी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे व नगरपरिषदांमधून नियुक्त नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.
अधिकाऱ्यांकडून दिशाभूल
आमदार सावकारे यांनी जलसंधारण कामासंदर्भात आक्षेप घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे जलसंधारण स्थानिक स्तर व जलसंधारण यांच्या कामात सरमिसळ करून जि. प. सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी हे कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करायला जातात, अशी तक्रारही सावकारे यांनी यावेळी केली. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपाला न घाबरता कामांची तपासणी करावी, असे सांगितले. चाळीसगाव तालुक्यातदेखील कोणतेही काम प्रत्यक्ष झालेले नसताना रस्त्याची कामे कागदावरच करून निधी काढला गेला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड-म्हाळसा येथील सरपंचांनी केलेल्या तक्रारीचेदेखील अधिकाऱ्यांनी वा पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेना
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे ३.४१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी या बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभागांतर्गत नियोजन विभागातून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केली. हा प्रश्न विधीमंडळात चर्चेला घेवून मदतीसाठी तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून या कंपन्यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी चर्चादेखील करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. बोंडअळीच्या कपाशी नुकसानीसाठी अर्ज भरण्याची मुदत ५ डिसेंबर असून, ती वाढविण्यात यावी तसेच पीक संवर्धन योजनेंतर्गत काही निधी देण्यात येत असेल तर त्याचे नियोजन करावे, अशी मागणीही आमदार डॉ. पाटील यांनी केली. यावर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पीक संवर्धन योजनेंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचेही त्यांनी सांगितले.