म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील वरखेडे लगतच्या पळसमणी शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. सुसाबाई धना नाईक (भिल) (्वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच जणांचा जीव गेला असून, त्यात तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
शेतमजूर असलेल्या सुसाबाई भिल या रविवारी (दि. २६) सकाळी वरखेडे येथील गिरणा पात्रालगत पळसमणी शिवारातील शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेतात दहा ते बारा मजुरांसह काम करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागाला मोठी जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत कार्यवाहीविषयी नाराजी व्यक्त केली. माजी आमदार राजीव देशमुख, दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगेश राजपूत, तहसीलदार कैलास देवरे, दिनेश पाटील, शाम देशमुख, भगवान राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
तालुक्यातील गिरणा परिसरात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून, गेल्या पाच महिन्यात बिबट्याचा हा पाचवा हल्ला असून, या हल्ल्यात आतापर्यंत ३ महिला व २ बालक अशा ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतात जाण्यास रस्ता नसून निमुळती पाऊलवाट आहे.
चाळीसगाव तालुक्यातील या सततच बिबट्या हल्ल्याने परिसरात निर्माण झालेल्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे मृत सुसाबाई भिल यांना गेल्या १ महिन्यांपासून आपल्या शेतातील कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नव्हते. विनवण्या करून त्यांनी रविवारी (दि. २६) महिलांना आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी आणले. दुपारी कापूस वेचत असताना बिबट्याने नेमके त्यांनाच हेरले. बिबट्याने त्यांना जबड्यात पकडून फरफटत नेले. बिबट्याला हल्ला करताना सोबतच्या दोन महिलांनी व झाडावर असलेल्या माकडांनी पाहिले. बिबट्याला पाहून माकडांनी प्रचंड कल्लोळ केला. कापूस वेचणाऱ्या महिलांनी गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना बोलवले. सुसाबाई भिल यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
अपहरण करणारा जेरबंद
जळगाव ः बालकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या फरार संशयितास पोलिसांनी वर्षभरानंतर यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली. राजू भिकू पवार (वय ३२, रा. महागाव, ता. दारव्हा, जि.यवतमाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. राजूने १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या धनराज मंगाजी राठोड यांचा अडीच वर्षाचा मुलगा सौरभचे अपहरण केले होते.
शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील वरखेडे लगतच्या पळसमणी शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. सुसाबाई धना नाईक (भिल) (्वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच जणांचा जीव गेला असून, त्यात तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
शेतमजूर असलेल्या सुसाबाई भिल या रविवारी (दि. २६) सकाळी वरखेडे येथील गिरणा पात्रालगत पळसमणी शिवारातील शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेतात दहा ते बारा मजुरांसह काम करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागाला मोठी जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे, यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत कार्यवाहीविषयी नाराजी व्यक्त केली. माजी आमदार राजीव देशमुख, दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगेश राजपूत, तहसीलदार कैलास देवरे, दिनेश पाटील, शाम देशमुख, भगवान राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
तालुक्यातील गिरणा परिसरात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून, गेल्या पाच महिन्यात बिबट्याचा हा पाचवा हल्ला असून, या हल्ल्यात आतापर्यंत ३ महिला व २ बालक अशा ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतात जाण्यास रस्ता नसून निमुळती पाऊलवाट आहे.
चाळीसगाव तालुक्यातील या सततच बिबट्या हल्ल्याने परिसरात निर्माण झालेल्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे मृत सुसाबाई भिल यांना गेल्या १ महिन्यांपासून आपल्या शेतातील कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नव्हते. विनवण्या करून त्यांनी रविवारी (दि. २६) महिलांना आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी आणले. दुपारी कापूस वेचत असताना बिबट्याने नेमके त्यांनाच हेरले. बिबट्याने त्यांना जबड्यात पकडून फरफटत नेले. बिबट्याला हल्ला करताना सोबतच्या दोन महिलांनी व झाडावर असलेल्या माकडांनी पाहिले. बिबट्याला पाहून माकडांनी प्रचंड कल्लोळ केला. कापूस वेचणाऱ्या महिलांनी गावाकडे धाव घेत ग्रामस्थांना बोलवले. सुसाबाई भिल यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
अपहरण करणारा जेरबंद
जळगाव ः बालकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या फरार संशयितास पोलिसांनी वर्षभरानंतर यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली. राजू भिकू पवार (वय ३२, रा. महागाव, ता. दारव्हा, जि.यवतमाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. राजूने १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या धनराज मंगाजी राठोड यांचा अडीच वर्षाचा मुलगा सौरभचे अपहरण केले होते.