म. टा. प्रतिनिधी, जळगाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वेळवेर उपचार न मिळाल्याने शनिवारी अनेक रुग्णांची फरफट झाली. यात सर्पदंश झालेल्या तीन रुग्णांना उपचारसाठी बसून राहावे लागले त्यांना कर्मचाऱ्यांकडून अरेरावी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयात शनिवारी (दि. ६) सकाळी सर्पदंश झालेल्या शोभाबाई संतोष महाजन (रा. म्हसावद, ता.जळगाव), हिरालाल वसंत भिल (रा. पंचक, ता. चोपडा), सहिम सुलतान (रा. जलचक्र, ता. बोदवड) हे उपचारासाठी आले होते. रुग्णास केसपेपर काढल्यानंतर त्यांना इमर्जन्सी वॉर्डात नेण्यात आले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे त्यांची तपासणी लवकर झाली नाही. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी कंपाऊंडर यांना तपासणी करण्यासाठी सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर तासभर बसवून ठेवल्यानंतर या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले.
प्रौढाचा मृत्यू
विषारी द्रव्य सेवन केल्यामुळे झालेल्या विषबाधेत प्रौढाचा शनिवारी सकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी देवराम नाईक (वय ५०, रा. डोमगाव, ता. जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. नाईक यांनी शुक्रवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजता विषारी द्रव्य सेवन केले होते.
विषबाधा झालेल्या तरुणीचा मृत्यू
विषबाधा झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीचा शनिवारी सकाळी ९.४५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.निषा दत्तात्रय हिवरे (वय २२, रा.श्रीधरनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मनिषा हिला २८ सप्टेंबर रोजी विषबाधा झाली होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वेळवेर उपचार न मिळाल्याने शनिवारी अनेक रुग्णांची फरफट झाली. यात सर्पदंश झालेल्या तीन रुग्णांना उपचारसाठी बसून राहावे लागले त्यांना कर्मचाऱ्यांकडून अरेरावी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयात शनिवारी (दि. ६) सकाळी सर्पदंश झालेल्या शोभाबाई संतोष महाजन (रा. म्हसावद, ता.जळगाव), हिरालाल वसंत भिल (रा. पंचक, ता. चोपडा), सहिम सुलतान (रा. जलचक्र, ता. बोदवड) हे उपचारासाठी आले होते. रुग्णास केसपेपर काढल्यानंतर त्यांना इमर्जन्सी वॉर्डात नेण्यात आले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे त्यांची तपासणी लवकर झाली नाही. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी कंपाऊंडर यांना तपासणी करण्यासाठी सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर तासभर बसवून ठेवल्यानंतर या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले.
प्रौढाचा मृत्यू
विषारी द्रव्य सेवन केल्यामुळे झालेल्या विषबाधेत प्रौढाचा शनिवारी सकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी देवराम नाईक (वय ५०, रा. डोमगाव, ता. जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. नाईक यांनी शुक्रवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजता विषारी द्रव्य सेवन केले होते.
विषबाधा झालेल्या तरुणीचा मृत्यू
विषबाधा झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीचा शनिवारी सकाळी ९.४५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.निषा दत्तात्रय हिवरे (वय २२, रा.श्रीधरनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मनिषा हिला २८ सप्टेंबर रोजी विषबाधा झाली होती.