अ‍ॅपशहर

झोपलेल्या सरकारला जागे करा

राज्यातील भाजपा-सेना सरकार झोपी गेल्याचे सोंग घेत असून, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी विरोधी पक्षांकडून काढण्यात आलेल्या संघर्षयात्रेत बोलत होते.

Maharashtra Times 17 Apr 2017, 4:00 am
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला; शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा पारोळ्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम please wake up sleeping state government
झोपलेल्या सरकारला जागे करा


म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील भाजपा-सेना सरकार झोपी गेल्याचे सोंग घेत असून, झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी विरोधी पक्षांकडून काढण्यात आलेल्या संघर्षयात्रेत बोलत होते. शनिवारी (दि. १५) मुक्ताईनगरात आलेल्या संघर्षयात्रेतील नेत्यांनी रविवारी (दि. १६) जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेली संघर्ष यात्रा रविवारी, जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर तालुक्यात आली होती.

हे सरकार व्यापाऱ्यांचे हीत जोपासणारे असून, शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोपही पवार यांनी यावेळी बोलताना केला. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय राज्यातील मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. शेतकऱ्यांचा फक्त सातबारा कोरा करायचा नाही तर खर्चाच्या आधारभूत दीडपट भाव मिळाला पाहिजे, असेही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतांना म्हणाले.

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले

राज्यातील भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात भाग पाडले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या सभेत संघर्ष यात्रेतील निलंबित आमदारांनी सभेत मत व्यकत केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून साताबारा कोरा करणे, शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळाला पाहिजे, असाही सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

पारोळा शहरातील किसान कॉलेजच्या प्रांगणावर रविवारी (दि. १६) सकाळी संघर्ष यात्राची जाहीर सभा झाली. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील केदार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार अबू आझमी, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी आमदार अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी २००८ मध्ये केंद्रात युपीएचे सरकार असताना कर्जमाफीचा योग्य निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर सन २०१४

पासून आतापर्यंत सतत नापिकीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. .

कर्जमाफीला ‘जय महाराष्ट्र’

एकीकडे पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ करतात तर मुख्यमंत्री फडणवीस ‘मी मुख्यमंत्री बोलतो’ हा नवीन फंडा हाती घेतला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली असून, शिवसेनेने कर्जमाफीला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला. आपण युपी मॉडेल पाहण्याऐवजी युतीचे मॉडेल मोडीत काढले पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी आमदारांचे शंभर टक्के निलंबन झाले तरी चालेल मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही विखे पाटील यांनी शेवटी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज