डॉ. राधेश्याम चौधरी यांचा अधीक्षकांना प्रश्न
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जळगाव शहरात गेल्या काही दिवासांपासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक संपला का? असा प्रश्न काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरामध्ये चोऱ्या, घरफोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे.तसेच जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये घरफोडीच्या घटना झाल्याने जिल्ह्यात आणि शहरात पोलिसांचा वचक राहिला का नाही, असा प्रश्न या निवेदनातून डॉ. चौधरींनी व पोलिस प्रशासनाला विचारला आहे. सध्या कोणताही धार्मिक सण, उत्सव निवडणुका व इतर कार्यक्रम नसल्यामुळे कोणताही अतिरिक्त बंदोबस्ताचा तणाव पोलिस प्रशासनावर नसताना असे घडणे समर्थनीय वाटत नाही, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक संपलेला आहे का?, असा प्रश्नही निर्माण होतो.
शेवटी, या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना भीतीमुक्त करण्याची मागणी डॉ. चौधरी यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी नदीम काझी, ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, मनोज चौधरी, कफिल अहमद शेख, अबुजार शेख, नरेंद्र पाटील, संजय पाटील उपस्थित होते.
कर्तव्यात कसूर का?
शहरातील विविध भागांत वारंवार होणाऱ्या या घटनांचे उत्तरदायित्व निश्चित करून किंवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस प्रशासनात आपण कुणावर कार्यवाही केली आहे का?, असा सवालही या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. जळगाव शहराच्या नवीन वसाहतीत रात्रीची गस्त पुरेशी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात आहे का, जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी आपण किंवा आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली का, छडा लावण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी आपण हाती असलेल्या कंट्रोल रूम व अतिरिक्त पोलिस दलाचा उपयोग करून विशेष कृती आराखडा तयार केला आहे का, असेही प्रश्न डॉ. चौधरी यांनी यामध्ये उपस्थित केले आहेत.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जळगाव शहरात गेल्या काही दिवासांपासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, ही परिस्थिती लक्षात घेता पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक संपला का? असा प्रश्न काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरामध्ये चोऱ्या, घरफोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे.तसेच जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये घरफोडीच्या घटना झाल्याने जिल्ह्यात आणि शहरात पोलिसांचा वचक राहिला का नाही, असा प्रश्न या निवेदनातून डॉ. चौधरींनी व पोलिस प्रशासनाला विचारला आहे. सध्या कोणताही धार्मिक सण, उत्सव निवडणुका व इतर कार्यक्रम नसल्यामुळे कोणताही अतिरिक्त बंदोबस्ताचा तणाव पोलिस प्रशासनावर नसताना असे घडणे समर्थनीय वाटत नाही, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारावर वचक संपलेला आहे का?, असा प्रश्नही निर्माण होतो.
शेवटी, या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना भीतीमुक्त करण्याची मागणी डॉ. चौधरी यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी नदीम काझी, ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, मनोज चौधरी, कफिल अहमद शेख, अबुजार शेख, नरेंद्र पाटील, संजय पाटील उपस्थित होते.
कर्तव्यात कसूर का?
शहरातील विविध भागांत वारंवार होणाऱ्या या घटनांचे उत्तरदायित्व निश्चित करून किंवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस प्रशासनात आपण कुणावर कार्यवाही केली आहे का?, असा सवालही या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. जळगाव शहराच्या नवीन वसाहतीत रात्रीची गस्त पुरेशी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात आहे का, जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी आपण किंवा आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली का, छडा लावण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी आपण हाती असलेल्या कंट्रोल रूम व अतिरिक्त पोलिस दलाचा उपयोग करून विशेष कृती आराखडा तयार केला आहे का, असेही प्रश्न डॉ. चौधरी यांनी यामध्ये उपस्थित केले आहेत.