अ‍ॅपशहर

अतिक्रमण हटावसाठी बंदोबस्त द्या

शहरातील मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर पुन्हा बसलेले हॉकर्स व इतर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी महिनाभरासाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी (दि. २७) दिलेल्या पत्रात केली आहे. संबधित पोलिसांचा महिन्याचा पगार देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. आजपासून जळगावात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
मनपा आयुक्तांचे पोलिस अधीक्षकांना पत्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police security for encroachment in jalgaon city
अतिक्रमण हटावसाठी बंदोबस्त द्या


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर पुन्हा बसलेले हॉकर्स व इतर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी महिनाभरासाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी (दि. २७) दिलेल्या पत्रात केली आहे. संबधित पोलिसांचा महिन्याचा पगार देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. आजपासून जळगावात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

जळगाव महापालिकेने शहरातील ११ अडचणीच्या ठिकाणच्या हॉकर्सचे स्थलांतर करून रस्ते मोकळे करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले. तसेच शहरातील इतर भागातही अतिक्रमण वाढत असल्यामुळे महासभेत खडाजंगी झाली होती. सभागृह नेते रमेश जैन व मनसेचे अनंत जोशी यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. अतिक्रमण विभागातील महिला व पुरुष कर्मचारी तसेच किरकोळ वसुलीचा कर्मचाऱ्यांकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोपदेखील अनंत जोशी यांनी केला होता. त्यामुळे आयुक्त जीवन सोनवणे यांनी लवकरच धडक अतिक्रमण मोहीम राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार आयुक्तांनी मंगळवारी (दि. २७) पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना पत्र दिले. यात त्यांनी एक महिन्यासाठी ८ पुरुष पोलिस कर्मचारी व २ महिला कर्मचारी यांचा बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. या कर्मचाऱ्यांचा महिन्याच्या पगाराची रक्कम महापालिकेतून अदा करण्याचीदेखील तयारी त्यांनी दाखविली आहे.

धडक मोहीम आजपासून

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी (दि. २८) सकाळी ७ वाजेपासून धडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी बंदोबस्त मिळत नाही तोपर्यंत चार दिवसांसाठी बंदोबस्त घेवून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यात सुभाष चौक, बळीराम पेठ, शिवाजी रोड यासह शहरातील इतर भागातील अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज