डॉ. प्रवीण तोगडियांचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
देशात रॉकेटच्या गतीने रुग्णांची संख्या वाढत असून, येत्या २० वर्षांत देशातील ५० टक्के लोकसंख्येला आजाराने ग्रासलेले असेल. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व अन्य काही संस्थांच्या मते त्यांच्या औषधोपचारावरील खर्च २८० लाख कोटींवर जाईल. त्यामुळे देश आर्थिक महासत्ता तर सोडाच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर लोटला जाईल, असा इशारा विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे.
रविवारी (दि. २१) सकाळी इंडिया हेल्थ लाइन या उपक्रमांतर्गत आरोग्यदूत नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. तोगडिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. कुलदीप राऊळ, डॉ. विक्रम चौबे, प्रांतमंत्री अनंत पांडे, प्रांत प्रभारी हेमंत त्रिवेदी, सुरेंद्र मुंदडा, राजेश जहागिरदार, ललित चौधरी, डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे उपस्थित होते. देशाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे मिळून एकूण उत्पन्न १६ लाख कोटी रुपये असताना, देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी १४ लाख कोटी रुपये खर्च करीत आहेत. २० वर्षांत देशातील आजारी व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपर्यंत जाईल.
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
देशात रॉकेटच्या गतीने रुग्णांची संख्या वाढत असून, येत्या २० वर्षांत देशातील ५० टक्के लोकसंख्येला आजाराने ग्रासलेले असेल. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व अन्य काही संस्थांच्या मते त्यांच्या औषधोपचारावरील खर्च २८० लाख कोटींवर जाईल. त्यामुळे देश आर्थिक महासत्ता तर सोडाच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर लोटला जाईल, असा इशारा विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे.
रविवारी (दि. २१) सकाळी इंडिया हेल्थ लाइन या उपक्रमांतर्गत आरोग्यदूत नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. तोगडिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. कुलदीप राऊळ, डॉ. विक्रम चौबे, प्रांतमंत्री अनंत पांडे, प्रांत प्रभारी हेमंत त्रिवेदी, सुरेंद्र मुंदडा, राजेश जहागिरदार, ललित चौधरी, डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे उपस्थित होते. देशाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे मिळून एकूण उत्पन्न १६ लाख कोटी रुपये असताना, देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी १४ लाख कोटी रुपये खर्च करीत आहेत. २० वर्षांत देशातील आजारी व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपर्यंत जाईल.