उत्तमोत्तम कलाकृतींचे होणार सादरीकरण
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
दि जळगाव पीपल्स बँक प्रायोजित व परिवर्तन, जळगाव तर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ‘साहित्य अभिवाचन महोत्सव २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प या सगळ्या कलांचा समुच्चय असलेला साहित्य अभिवाचन महोत्सव २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे.
जळगाव शहर सांस्कृतिकदृष्ट्या विकसित व्हावे या उद्देशाने परिवर्तनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाचा अभिवाचन महोत्सव ‘वाचन संस्कृती समृद्ध करू’ या अभियानाला समर्पित आहे. उत्तमोत्तम साहित्य, कथा, कविता, कादंबरी, ललित लेख यांचा परिचय व्हावा, नव्या पिढीची पुस्तकांशी मैत्री व्हावी, तरुणांमध्ये वाचन संस्कार वाढावा, रुजावा यावर अभिवाचन महोत्सवाचा भर असणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावर आधारित ‘चित्तो जेथा भयशून्य’ या अभिवाचनाने होणार आहे. मूळ बंगाली, इंग्रजी व मराठी अशा तीनही भाषेत प्रथमच रवींद्रनाथांचे साहित्य अभिवाचनाद्वारे रसिकांसमोर येणार आहे.
विद्यार्थ्यांचा सहभाग
या महोत्सवातील अभिवाचनाचे सादरीकरण विद्यार्थ्यांचे पुस्तकाशी नाते जुळावे यासाठी शहरातील इतरही ठिकाणी, महाविद्यालयातही केले जाणार आहे. त्यात काशिनाथ पलोड शाळा व अनुभूती या दोन शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट सेवा प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला असून, दररोज संध्याकाळी ७ वाजता अभिवाचनाचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवासाठी ना. धो. महानोर, अशोक जैन, विजय बाविस्कर, अनिल पाटकर, मोहन थत्ते यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
दि जळगाव पीपल्स बँक प्रायोजित व परिवर्तन, जळगाव तर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ‘साहित्य अभिवाचन महोत्सव २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प या सगळ्या कलांचा समुच्चय असलेला साहित्य अभिवाचन महोत्सव २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे.
जळगाव शहर सांस्कृतिकदृष्ट्या विकसित व्हावे या उद्देशाने परिवर्तनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाचा अभिवाचन महोत्सव ‘वाचन संस्कृती समृद्ध करू’ या अभियानाला समर्पित आहे. उत्तमोत्तम साहित्य, कथा, कविता, कादंबरी, ललित लेख यांचा परिचय व्हावा, नव्या पिढीची पुस्तकांशी मैत्री व्हावी, तरुणांमध्ये वाचन संस्कार वाढावा, रुजावा यावर अभिवाचन महोत्सवाचा भर असणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावर आधारित ‘चित्तो जेथा भयशून्य’ या अभिवाचनाने होणार आहे. मूळ बंगाली, इंग्रजी व मराठी अशा तीनही भाषेत प्रथमच रवींद्रनाथांचे साहित्य अभिवाचनाद्वारे रसिकांसमोर येणार आहे.
विद्यार्थ्यांचा सहभाग
या महोत्सवातील अभिवाचनाचे सादरीकरण विद्यार्थ्यांचे पुस्तकाशी नाते जुळावे यासाठी शहरातील इतरही ठिकाणी, महाविद्यालयातही केले जाणार आहे. त्यात काशिनाथ पलोड शाळा व अनुभूती या दोन शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट सेवा प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला असून, दररोज संध्याकाळी ७ वाजता अभिवाचनाचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवासाठी ना. धो. महानोर, अशोक जैन, विजय बाविस्कर, अनिल पाटकर, मोहन थत्ते यांचे मार्गदर्शन लाभत आहे.